AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी तिघांना अटक, सरकारची भूमिका काय?

अंतरवाली सराटीतल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आता तिघांना अटक केलीय. पुराव्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर गुन्हे मागे घेणार होते, मग आता अटक सुरु झाली, सरकारचा कोणता डाव? असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय.

जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी तिघांना अटक, सरकारची भूमिका काय?
| Updated on: Nov 25, 2023 | 10:32 PM
Share

जालना | 25 नोव्हेंबर 2023 :  मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली होती. अंतरवाली सराटीतल्या या दगडफेक प्रकरणात अंबड पोलिसांनी तिघांना अटक केलीय. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसाट आणि कैलाश सुखसे अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांवर कलम 307- जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, कलम 332 आणि 333 – सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, कलम 353- सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 427- सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, अशी कलमं लावण्यात आलीत. अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश बेदरेकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आलीय.

जरांगे पाटलांनी या अटकेवरुन सरकारला सवाल केले आहेत. आधी गुन्हे मागे घेणार असं म्हणाले होते. आता अटक सुरु झाली. सरकारचा कोणता डाव आहे? असं जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. मात्र आधी दगडफेक झाली, त्यामुळेच लाठीचार्ज झाल्याचा दावा तत्कालीन जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी केला होता. तर त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दगडफेकीमुळेच लाठीचार्ज झाल्याचं म्हटलं. मात्र नंतर आपण नीट माहिती घेतल्यावर पोलिसांकडून चुकीचंच घडलं, असं फडणवीसांनी tv9च्या मुलाखतीत म्हटलं होतं.

‘पोलीस दबावाला बळी पडणार नाही’, अजित पवारांचं वक्तव्य

आता पुराव्यांच्या आधारे तिघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केलीय. जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु होतं. मात्र 1 सप्टेंबरला पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. मात्र दगडफेक झाल्यानंच पोलिसांनी नाईलाजास्तव लाठीचार्ज केल्याचं भुजबळांनी वारंवार म्हटलंय. पण आता पोलिसांनी कारवाई सुरु केलीय. तिघांना पोलिसांकडून अटक झालीय. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस दबावाला बळी पडणार नाही, असं म्हटलंय.

जरांगे पाटलांचा रोख छगन भुजबळांवर

तर इकडे अजित पवारांनी जरांगे आणि भुजबळांच्या शाब्दिक चकमकीवरुन नाव न घेता टोला लगावलाय. वाचाळवीरांची संख्या वाढली असून अरेला कारे सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी तुमच्याच माणसाला रोखा म्हणजे, असं म्हटलं आहे. याचा अर्थ म्हणजे जरांगे पाटलांचा रोख छगन भुजबळांवरच आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.