AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही मिळाले हा विषय गौण, आता विषय महत्वाचा विषय कोणता, जयंत पाटील म्हणाले…

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडू यांच्यावर टीका करत असतांना शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही मिळाले हा विषय गौण, आता विषय महत्वाचा विषय कोणता, जयंत पाटील म्हणाले...
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Oct 28, 2022 | 8:39 PM
Share

सांगली : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना चिमटा काढला आहे. किराणा वाटपावरुन सुरू असलेल्या वाद खोक्यापर्यन्त जाऊन ठेपला आहे. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी बच्चू कडू यांच्यासाठी मंत्री पद महत्वाचा विषय गौण आहे, त्यांनी खोके घेतले की नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल. त्यातून ते क्लीन होऊन बाहेर येणं महत्वाचे असल्याचे म्हणत राणा आणि कडू यांच्या वादात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी 1 तारखेपर्यन्त राणा यांना मी खोके घेतले की नाही हे सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे. त्यावरूनच बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खरंतर दिवाळी निमित्त किराणा वाटपावरुन राणा यांच्यावर कडू यांनी टीका केली होती, त्यावर राणा यांनी पलटवार करत असतांना बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप केला होता.

दिवाळी निमित्ताने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून गरिबांना किराणा वाटप सुरू होते.

त्यावर बच्चू कडू यांनी टीका करत असतांना खिसे कापून किराणा वाटायला काय लागते असे म्हणत राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती.

त्यावरच रवी राणा यांनी आम्ही आमदार होण्याच्या आधीपासून किराणा वाटतो, बच्चू कडूने एक किलो तरी साखर वाटून दाखवावी असं आव्हान केले होते.

याच वेळी रवी राणा यांनी बच्चू कडू हे तोडीबाज माणूस आहे, आंदोलन करून तोडी करतो, आमदार, खासदार निवडणुका आले की पैसे घेतो अशी टीका केली होती.

याच दरम्यान बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले तेव्हा पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले कडू यांच्यावर असा आरोप झाल्याने कडू हे आक्रमक झाले होते.

राणा कुटुंबाला त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करा यासाठी 1 नोव्हेंबर पर्यन्तची मुदत दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कडू यांनी म्हंटले होते.

याच दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडू यांच्यावर टीका करत असतांना शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.