AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांनी पावले उचलली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती…जितेंद्र आव्हाड यांनी ठेवले त्या घटनेवर बोट

Santosh Deshmukh murde case Beed protest:एका दलित वाचमानला मारहाण झाली. त्यामुळे संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले होते. या बीड जिल्ह्याचे सत्यनाश कोणी केला असले तर पोलिसांनी आणि बीडच्या पालकमंत्र्यानी केला.

पोलिसांनी पावले उचलली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती...जितेंद्र आव्हाड यांनी ठेवले त्या घटनेवर बोट
जितेंद्र आव्हाड
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 28, 2024 | 3:09 PM
Share

Santosh Deshmukh murde case Beed protest: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर घाणाघाती टीका केली. बीड जिल्ह्याचे नुकसान या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्याने आणि पोलिसांनी केले, असा आरोप आव्हाड यांनी मुंडे यांचे नाव न घेता केले.

…तर संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष देशमुख हा फक्त चेहरा झाला. त्यांची हत्या करणाऱ्यास वाल्मिकी नका म्हणू तो वाल्या आहे. आज संतोष देशमुख या एका माणसासाठी लढत आहेत. कारण तो स्वत:च्या जातीसाठी गेला नव्हता. एका दलित वाचमानला मारहाण झाली. त्यामुळे संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले होते. या बीड जिल्ह्याचे सत्यनाश कोणी केला असले तर पोलिसांनी आणि बीडच्या पालकमंत्र्यानी केला. त्याच दिवशी अॅट्रसिटी केस दाखल झाली असती तर संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले नसते आणि हत्या झालीच नसती.

बीडमध्ये ठिणगी पडली आग…

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष बांगर यांच्यावर वाल्मिक याने अनेक केसेस टाकल्या. त्यामुळे सध्या अशी परिस्थिती आहे की संतोष बांगर यांना घरच नाही. कोर्टच त्यांचे घर झाले आहे. त्यांचा वेळ कोर्टातच जात आहे. सुरेश धस यांनी जी नावे घेतली, ज्यांचे खून झाले, ते वंजारी होते. मग मारणारे वंजारीच होते. बीडमध्ये एक ठिणगी पडली आहे. त्याची आग महाराष्ट्रात लागल्याशिवाय राहणार नाही.

राज्यातील संवेदना जिवंत आहे की नाही, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्या ताईचे कुंकू पुसले गेले. त्यांचे कुंकू कुणी आता परत आणून देणार आहे का? त्यांच्या भविष्याची कोणी चिंता केली आहे का? तरीही राजकारण सुरू आहे. आज मला एकी दिसतो, माणुसकीची दिसत आहे, ही एकी अशीच ठेवा. हा झंझावात आहे. असा कायम ठेवा, असे आव्हाड म्हणाले.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा