AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांनी पावले उचलली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती…जितेंद्र आव्हाड यांनी ठेवले त्या घटनेवर बोट

Santosh Deshmukh murde case Beed protest:एका दलित वाचमानला मारहाण झाली. त्यामुळे संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले होते. या बीड जिल्ह्याचे सत्यनाश कोणी केला असले तर पोलिसांनी आणि बीडच्या पालकमंत्र्यानी केला.

पोलिसांनी पावले उचलली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती...जितेंद्र आव्हाड यांनी ठेवले त्या घटनेवर बोट
जितेंद्र आव्हाड
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 28, 2024 | 3:09 PM
Share

Santosh Deshmukh murde case Beed protest: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर घाणाघाती टीका केली. बीड जिल्ह्याचे नुकसान या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्याने आणि पोलिसांनी केले, असा आरोप आव्हाड यांनी मुंडे यांचे नाव न घेता केले.

…तर संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष देशमुख हा फक्त चेहरा झाला. त्यांची हत्या करणाऱ्यास वाल्मिकी नका म्हणू तो वाल्या आहे. आज संतोष देशमुख या एका माणसासाठी लढत आहेत. कारण तो स्वत:च्या जातीसाठी गेला नव्हता. एका दलित वाचमानला मारहाण झाली. त्यामुळे संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले होते. या बीड जिल्ह्याचे सत्यनाश कोणी केला असले तर पोलिसांनी आणि बीडच्या पालकमंत्र्यानी केला. त्याच दिवशी अॅट्रसिटी केस दाखल झाली असती तर संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले नसते आणि हत्या झालीच नसती.

बीडमध्ये ठिणगी पडली आग…

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संतोष बांगर यांच्यावर वाल्मिक याने अनेक केसेस टाकल्या. त्यामुळे सध्या अशी परिस्थिती आहे की संतोष बांगर यांना घरच नाही. कोर्टच त्यांचे घर झाले आहे. त्यांचा वेळ कोर्टातच जात आहे. सुरेश धस यांनी जी नावे घेतली, ज्यांचे खून झाले, ते वंजारी होते. मग मारणारे वंजारीच होते. बीडमध्ये एक ठिणगी पडली आहे. त्याची आग महाराष्ट्रात लागल्याशिवाय राहणार नाही.

राज्यातील संवेदना जिवंत आहे की नाही, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्या ताईचे कुंकू पुसले गेले. त्यांचे कुंकू कुणी आता परत आणून देणार आहे का? त्यांच्या भविष्याची कोणी चिंता केली आहे का? तरीही राजकारण सुरू आहे. आज मला एकी दिसतो, माणुसकीची दिसत आहे, ही एकी अशीच ठेवा. हा झंझावात आहे. असा कायम ठेवा, असे आव्हाड म्हणाले.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक