AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केडीएमसीच्या तिजोरीची चावी कोणाकडे? एकनाथ शिंदे करणार मोठी खेळी, लाडक्या बहिणीला मिळणार प्राधान्य

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून विजया पोटे यांचे नाव लाडकी बहीण म्हणून चर्चेत आहे.

केडीएमसीच्या तिजोरीची चावी कोणाकडे? एकनाथ शिंदे करणार मोठी खेळी, लाडक्या बहिणीला मिळणार प्राधान्य
KDMC
| Updated on: Mar 23, 2026 | 8:32 AM
Share

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात सध्या प्रचंड हालचाली सुरू आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या गोटात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मल्लेश शेट्टी, विकास म्हात्रे, जयवंत भोईर आणि महेश गायकवाड यांसारख्या मातब्बर नेत्यांनी या पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासाठी आता थेट ठाणे, मुंबई आणि दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू झाले आहे. मात्र, या पुरुष नेत्यांच्या स्पर्धेत नाराजी टाळण्यासाठी पक्षाकडून लाडकी बहीण कार्ड खेळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी विजया पोटे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकापेक्षा एक प्रबळ दावेदार

मिळालेल्या माहितीनुसार, सभापती पदासाठी शिवसेनेच्या गोटातून एकापेक्षा एक प्रबळ दावेदार समोर आले आहेत. यात जुन्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक म्हणून मल्लेश शेट्टी यांची ओळख आहे. गेल्या वेळी हुकलेली संधी यंदा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच विकास म्हात्रे हे भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षासाठी घेतलेली आक्रमक भूमिका आणि संघर्षाची जमेची बाजू त्यांच्या दाव्याला बळ देत आहे.

त्यासोबतच आमदार विश्वनाथ भोईर यांचे बंधू असलेल्या जयवंत भोईर यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याचा दावा करत आपली दावेदारी ठामपणे मांडली आहे. युवा चेहरा म्हणून महेश गायकवाड यांनीही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू केल्या असून, तरुण नेतृत्वाला संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभाव

पक्षातील बड्या नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा पाहता, कोणत्याही एका पुरुष नेत्याची निवड केल्यास इतरांची नाराजी ओढवून घेण्याची भीती पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. अशा परिस्थितीत, राज्यात गाजत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी विजया पोटे यांना संधी देऊन सर्वांची समजूत काढली जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

या नाट्यमय घडामोडींवर भाष्य करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक नगरसेवकाला पद मिळावे असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. या विधानामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून सर्वांच्या नजरा आता येणाऱ्या निर्णयाकडे लागल्या आहेत. येत्या आठवड्यात या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी की जयवंत भोईर यांच्यातील स्पर्धेत विजया पोटे बाजी मारणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.