AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद, यादीत तुमचंही नाव आहे का? करा चेक

गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा धक्का दिला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद, यादीत तुमचंही नाव आहे का? करा चेक
Ladki Bahin YojanaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 3:44 PM
Share

राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजेनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार दीड हजार रुपये जमा करतं. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं, काही ठिकाणी तर सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या, या महिलांना तेव्हाच या योजनेतून वगळण्यात आलं होतं. ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या, या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं.

दरम्यान त्यानंतर या योजनेचा लाभ फक्त पात्र असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, यासाठी सरकारने या योजनेसाठी केवासी सुरू केली होती. गेल्या दीड वर्षांमध्ये केवायसीच्या माध्यमातून  या योजनेची पडताळणी करण्यात आली. आता 30 एप्रिल रोजी सरकारने या योजनेच्या केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती, ती देखील संपली आहे. त्यानंतर आता सरकारने राज्यातील तब्बल 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवलं आहे. ज्या महिला या योजेनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे.  तर या योजनेसाठी एक कोटी 89 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला नियमीतपणे दीड हजार रुपये जमा होणार आहेत.

सरकारने या योजनेसाठी केवायसी करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती, मात्र काही महिलांनी तरी देखील केवायसी न केल्यानं  त्या या योजेनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, तर काही महिलांनी केवायसी केली, मात्र त्या या योजनेच्या अटींमध्ये बसत नसल्यानं त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. अशा सर्व महिलांना आता या योजनेतून वगळण्यात आलं आहे. तब्बल 54 महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!