AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने खास योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचालाभ घेतला. मात्र आता..

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Apr 27, 2026 | 9:09 AM
Share

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या केवळ काही महिने आधीच त्यांची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली. ज्या अतंर्गत राज्यातील आर्थिकदृष्यट्या दुर्बल महिलांना दरमहा पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदवलं, आणि पात्र लाभार्थी महिलांना तेव्हापासून दरमहा 1500 रुपये दिले जातात. दर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होत असतात. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतलाच, त्याचा महायुती सरकरालही मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतादन केल्याने महायुतू सरकार पुन्हा सत्तेत आलं. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ च्या ऑनलाइन ग्राहक ओळख (अर्थात ई-केवायसी) प्रक्रियेची मुदत संपण्यासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. 30 एप्रिल हा शेवटचा दिवस असणार आहे. ई-केवायसीसाठी महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र अजूनही सुमारे 26 लाख बहिणींनी ईकेवायसी केलेली नाही, त्यामुळे येत्या 4 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाह तर लाखो महिला अपात्र ठरू शकतात.

लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा

लाडकी बहीण योजनेच्या राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त , जवळपास 2 कोटी 47 लाख महिला लाभार्थी आहेत. पण जवळपास 26 महिलांकडे ई-केवायसी करण्यास पुरेशी कागदपत्र नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत आत्तापर्यंत 3 वेळा वाढवण्यात आली आहे. आता 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असून त्यानंतर ज्या महिलांची ई-केवायसी नसेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

महिला व बाल विकास विभागाने मुदतवाढ दिली होती, मात्र अजूनही 26 लाखांपक्षा अधिक महिलांनी ई-केवायसी केलेलीची नाही. आज 27 तारीख आहे, त्यामुळे ही मुदत संपण्यासाठी आता फक्त 4 दिवस (30 एप्रिल) उरले आहेत. मात्र या लाभार्थी महिला शेवटच्या 4 दिवसांत ई-केवायसी पूर्ण करतील, याची शक्यता कमी असून त्यामुळेच एप्रिलनंतर लाखो लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली. 30 एप्रिल रोजी बंक बंद होईपर्यंत या योजनेची पडताळणी सुरू राहार आहे, या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीमनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी लवकरता लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्याेना योजनेचा लाभ आणि मिळणारे पैसे यांच्यापासून वंचित रहावे लागू शकते.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...