AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव जरी आला तरी मराठ्यांमुळे….; मनोज जरांगेंचं लातूरमध्ये मोठं विधान

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आज लातूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे. मराठा आणि धनगर आरक्षणावर मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देव जरी आला तरी मराठ्यांमुळे....; मनोज जरांगेंचं लातूरमध्ये मोठं विधान
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 09, 2024 | 6:24 PM
Share

देव जरी आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की उगाच भांडण वाढवू देऊ नका. मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे. जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे. धनगर समाजाच्या लोकांनी आपल्या नेत्यांना सांगावं. धनगर समाजाच्या नेत्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही मध्ये येऊ नका. माझे मराठा बांधवाना आवाहन आहे की जात मोठी करा. मराठ्यांवर हात उचलू नका. जात गेली तर अस्तित्व संपेल, असं मनोज जरांगे म्हणाले. जरांगे सध्या लातूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

मुंडेंवर टीका

मनोज जरांगे पाटील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून रॅलीची परवानगी नाकारली. पण काहीही झाले तरी बीडची रॅली निघणार आहे. एवढा जातीवादी पालकमंत्री आम्ही कधी पहिला नाही, असं म्हणत जरांगेंनी मुंडेंवर टीका केली आहे. सरकार आणि विरोधी पक्ष माझ्याविरोधात आहेत. सरकार आणि विरोधी पक्षाने मला उघड पडण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या तुमच्या लेकराच्या कपाळावर आरक्षणाचा गुलाल लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असंही ते म्हणालेत.

निवडणुकीतील मतदानावर भाष्य

आपल्या काही चुका या निवडणुकीत झाल्यात त्या पुन्हा होऊ देऊ नका. तुम्ही लोकसभेला एकगठ्ठा मतदान केलं. पण काही मराठ्यांनी ज्यांना मतदान करायचे नव्हतं. त्याला मतदान केलं. कारण मी संगितले होते की कोणाला द्यायचे हे सांगितले नव्हते. म्हणून 10 हजार मतं दुसऱ्याला पडलं आणि 20 हजार मतदारांनी मतदानच केले नाही, असंही जरांगे म्हणालेत.

आमच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्यांना बढती दिली. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या त्या आम्हाला माहिती आहे. अधिकाऱ्यांना जातीवाद कशाला लागतो. अंबडमध्ये सभा घेतली त्या सभेत कोयत्याने हातपाय तोडायची भाषा केली तो जातीवाद नाही का? फडणवीस यांच्या सांगण्यावरून भुजबळने आमच्या समोर आंदोलनाला बसवलं. काल गावात रॅली काढली पण त्याना काय सुधरत नव्हतं. या बोळातून जा, त्या बोळातून जा असे करत होते. तिथे रॅली काढण्याचे कारण काहीतरी गोंधळ व्हावा आणि मी बदनाम व्हावा म्हणून रॅली काढली, असंही जरांगेंनी लातूरमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.