AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Thane Election 2025 Date : मुंबई, ठाणे पालिका निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाने सस्पेन्स संपवला; आता…

मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे आता या दोन्ही शहरांत कोणाची ताकद जास्त हे या निवडणुकीच्या माध्यमातून समजणार आहे.

BMC Thane Election 2025 Date : मुंबई, ठाणे पालिका निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाने सस्पेन्स संपवला; आता...
BMC THANE ELECTION DATE
| Updated on: Nov 04, 2025 | 5:15 PM
Share

BMC Thane Corporation Election Schedule: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची वाट पाहिली जात होती. या निवडणुकीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाकडे तर समस्त राज्याचे लक्ष लागले होते. सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे पालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाबद्दल काहीही सांगितलेले नाही. असे असले तरी ठाणे, मुंबई पालिकेची निवडणूक कधी होणार, याबाबत मात्र माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने नेमकी काय घोषणा केली आहे?

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मुंबई, ठाण्याच्या महापालिका निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केले आहे. यावेळी आम्ही फक्त नगरपंचायत आणि नागरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करणार आहोत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. या घोषणेनुसार 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागेल. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या अगोदर राज्यातील सर्व महापालिकांसाठी निवडणूक घेतली जाईल, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. यात मुंबई, ठाणे महापालिकेचाही समावेश असेल. म्हणजेच 31 जानेवारीच्या अगोदर मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे.

मुंबई, ठाण्याची निवडणूक का महत्त्वाची?

मुंबई महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची एकहाती सत्ता राहिलेली आहे. शिवसेनेचा हा गड भेदण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपा प्रयत्न करत आहे. शिवसेना पक्षाची दोन शकलं झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ताकद काहीश कमी झालेली आहे. त्यामुळे आता भाजपा शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन मुंबई महापालिकेचा गड काबीज करू पाहते आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी आम्हीच मुंबईवर भगवा फडकवणार असा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई जिंकता येणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. सोबतच ठाकरेंची मुंबईत किती ताकद राहिलेली आहे, हेही याच महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसेल. त्यामुळेच मुंबई पालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ठाण्याच्या निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष

मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच ठाण्याची पालिका निवडणुकही संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. कारण ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. शिंदे यांच्या या बालेकिल्ल्यात आपली ताकद वाढवण्याचा भाजपाकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. दुसरीकडे ठाकरे यांचा पक्षही शिंदे यांच्या ठाण्यातील ताकदीला आव्हान देत आलेला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका जिंकून शिंदे यांना धक्का देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यासाठी ठाकरेंनी पूर्ण ताकद लावलेली आहे. तर दुसरीकडे ठाण्याचा किंग मीच आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यापुढे असणार आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्याच्या पालिका निवडणुकीतही नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री