AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात सांगलीकरांचा विचार, तब्बल इतक्या कोटींची भरभक्कम मदत

राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिकांसाठी 10 कोटी 73 हजार रुपयांची मदत घोषित केलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नुकसान भरपाई ही गेल्या वर्षाची नाहीय. तर 2019-20 साली झालेल्या नुकसानाची आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात सांगलीकरांचा विचार, तब्बल इतक्या कोटींची भरभक्कम मदत
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Feb 07, 2023 | 8:11 PM
Share

मुंबई : काही महिन्यांपूर्वी सांगलीत पावसाने (Sangli Rain) हाहाकार उडवला. पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालेलं. अनेक घरांची पडझड झाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले. सर्वसामान्य नागरिकरांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर सर्वसामान्यांची ही हाक अखेर शासनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर हिवाळा निघून गेला. आता उन्हाळा सुरु होत असताना राज्य सरकारकडून सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने या पूरग्रस्त नागरिकांसाठी 10 कोटी 73 हजार रुपयांची मदत घोषित केलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नुकसान भरपाई ही गेल्या वर्षाची नाहीय. तर 2019-20 साली झालेल्या नुकसान भरपाईची आहे. अर्थात ही मदत पहिली मदत नसेल. पण राज्य सरकारकडून 2019 सालाच्या नुकसानीची आजही दखल घेतली जातेय हे महत्त्वाचं आहे.

सांगलीत पूरग्रस्त भागात नुकसान झालेल्यांना मदत म्हणून राज्य सरकारकडून 10 कोटी 73 हजार रुपयांची मदत जाहीर झालीय. अतिवृष्टीमुळे सांगतीत मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. विशेषत: मिरज, वाळवा, पलूस तालुकयात मोठे नुकसान झाले होते.

नागरिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून पंचनामे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या तालुक्यातील पंचनामे विहित वेळेत सादर न केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या सूचना ही शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

तसेच लाभार्थींना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील हा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे.

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या

दरम्यान, सांगली जिल्ह्यात दरवर्षी निसर्गाचा कोप होताना दिसतोय. कोल्हापुरातही तीच परिस्थिती आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ झालेली बघायला मिळाली होती. त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली होती.

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात राज्यात सातत्याने ओला दुष्काळ पडताना बघायला मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना बघायला मिळाल्या आहेत.

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांचा जीव गेल्याचं बघायला मिळालं आहे. याशिवाय अशा घटनांमुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडते. तसेच पावसामुळे बचावर कार्यात देखील अडचणी येतात.

Follow Us
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा.
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार.
एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर
एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर.
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर.
काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगलं...
काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगलं....
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी.
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर....
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर.....
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?.
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा.
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.