मुंबई : काही महिन्यांपूर्वी सांगलीत पावसाने (Sangli Rain) हाहाकार उडवला. पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालेलं. अनेक घरांची पडझड झाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले. सर्वसामान्य नागरिकरांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर सर्वसामान्यांची ही हाक अखेर शासनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर हिवाळा निघून गेला. आता उन्हाळा सुरु होत असताना राज्य सरकारकडून सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने या पूरग्रस्त नागरिकांसाठी 10 कोटी 73 हजार रुपयांची मदत घोषित केलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नुकसान भरपाई ही गेल्या वर्षाची नाहीय. तर 2019-20 साली झालेल्या नुकसान भरपाईची आहे. अर्थात ही मदत पहिली मदत नसेल. पण राज्य सरकारकडून 2019 सालाच्या नुकसानीची आजही दखल घेतली जातेय हे महत्त्वाचं आहे.