AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत : राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत : राजेश टोपे
| Updated on: May 12, 2021 | 8:09 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत सुतोवाच केलंय. लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं (Maharashtra lockdown to be extended till 31 march 2021 inform Health Minister Rajesh Tope).

राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊनबाबत अनेकांना अपेक्षा आहेत. मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोलून दाखवलं. कारण लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. साधारणतः कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 लाखांना पोहचलेला महाराष्ट्र आता 4 लाख 75 हजाराच्या दरम्यान आलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झालीय.”

महाराष्ट्राचा वाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा

भारताचा दर दिवशीचा रुग्णवाढीचा दर 1.4 म्हणजे साधारणतः दीड टक्का आहे. महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर प्रतिदिवस 0.8 इतकाआहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. बाधितांच्या दरातही महाराष्ट्रात घट झालीय. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, ” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

राजेश टोपे, “रुग्णांच्या संख्येत घट म्हणजे कोरोनाची कर्व पूर्ण स्टेबल झालीय असा याचा अर्थ नाही. पण आपण संख्येत घट होत असलेल्या राज्यांमध्ये आहोत. इतर राज्यांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. 36 राज्यांच्या या देशात आपण रुग्ण वाढीत 30 व्या क्रमांकावर आहोत. राज्यात म्युकरमायकोसिस वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होताना दिसत असले तरी काही ठिकाणी वाढत आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन किमान 15 दिवस वाढवावा अशी चर्चा आणि अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितली. तेच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील.”

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावे. पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. अशात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड (Covishield), तर 4 लाख कोव्हॅक्सिन (Covaccin) अशी 20 लाख लस बाकी आहे. 7 लाख कोविशिल्ड, तर 4 लाख कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा : 

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे

कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

लहान मुलांवर कोरोनाचा हल्ला, खबरदारी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स

Maharashtra lockdown to be extended till 31 march 2021 inform Health Minister Rajesh Tope

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.