लोकल बंद ते जमावबंदी, तुमच्या आयुष्यात आजपासून काय बदल?

राज्यात केवळ अन्नधान्य, भाजीपाला, किराणा माल, दूध, मेडिकलचे दुकान, रुग्णालये, दवाखाने, बँका यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत (Maharashtra Situation after partial lock down)

लोकल बंद ते जमावबंदी, तुमच्या आयुष्यात आजपासून काय बदल?
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 7:35 AM

मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली, तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू झाली असून त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. (Maharashtra Situation after partial lock down)

मुंबईचा कणा मानली जाणारी लोकलही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मालगाडी वगळता संपूर्ण देशभरातील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यासोबत मोनो, मेट्रो, एसटी बस, खासगी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरील देशातून येणारी आणि जाणारी विमानसेवाही बंद करण्यात आली आहे.

राज्यात केवळ अन्नधान्य, भाजीपाला, किराणा माल, दूध, मेडिकलचे दुकान, रुग्णालये, दवाखाने, बँका यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. त्याचप्रमाणे, वैद्यकीय, वाहतूक, महापालिका, पोलीस, सुरक्षा दल, विद्युत, इंटरनेट, पेट्रोलियम बँकिंग, आयटी, मनुष्यबळ, मीडिया अशा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ ओळखपत्र दाखवून बेस्ट किंवा सरकारी बसने प्रवास करता येईल. अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला सुरुवातीपासूनच दिला जात आहे.

शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे आधीच्या सूचनेनुसार थिएटर, नाट्यगृह, मॉल, जिम, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, मंदिरेही महिना संपेपर्यंत बंद राहतील. खाजगी कार्यालय आणि कंपन्याही पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर सरकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीही पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे. (Maharashtra Situation after partial lock down)

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने कोरोनाला थांबवण्यासाठी वृत्तपत्राची वितरण आणि विक्री थांबवण्यात आली आहे . वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र विक्रेते, डेपोधारक,वृत्तपत्र समूहाचे पदाधिकारी, वृत्तपत्र टाकणारी मुलं ही सर्व सहभागी असतात. या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता सभोवतालची परिस्थिती आरोग्यास अनुकूल होईपर्यंत नाईलाजास्तव वितरण थांबवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात रक्ताची कमतरता असल्यामुळे गर्दी न करता रक्तदान करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान जरुर करावे. (Maharashtra Situation after partial lock down)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.