Maharashtra News LIVE : भाजपात गोंधळ नाही, अराजकता आहे- संजय राऊत
Maharashtra News LIVE : आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
गेवराईचे तहसीलदार संदिप खोमणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन प्रस्ताव
गेवराई चे तहसीलदार संदिप खोमणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन प्रस्ताव, घरकुल वाळू घोटाळ्यानंतर होणार कारवाई. तहसीलदार संदिप खोमणे सिंडिकेट चालवत होते अशा आमदार विजयसिंह पंडित यांच्या आरोपानंतर तहसीलदारांची कुंडली उघड. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गेवराईचे तहसीलदार संदिप खोमणे यांच्याविरोधात गंभीर गैरव्यवहार केल्याप्रकरणी निलंबनाचा प्रस्ताव पाठवला आहे. तहसीलदार खोमणे यांनी वाळू माफियांच्या फायद्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने 6 खोटे आदेश काढले आणि त्यांना मिळालेल्या 6 कारणे दाखवा नोटिसांना केराची टोपली दाखवली.
-
जाफराबाद शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेत वेगवेगळ्या प्रकारचे योगासने केली, सकाळपासूनच या कार्यक्रमाला जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सहभाग नोंदवलाय,
-
-
सांगोला तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी मातेच्या मंदिरात धाडसी चोरी
मंदिरातील देवीचा चांदीचा मुखवटा, सोन्याचे डोळे, सोन्याचे मनी मंगळसूत्र तसेच पितळेच्या धातूचा मोठा घोडा चोरट्यांनी केला लंपास. विशेष म्हणजे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत झाली कैद . काल माध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके रवाना. या परिसरात पुरातन आणि नवसाला पावणाऱ्या देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली असून देवही आता सुरक्षित राहिले नाहीत का अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत…….
-
संजय राऊत यांची जोरदार टीका..
संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश आहेत का? असा मोठा सवाल राऊत यांनी केला. अमित शहा एक व्यापारी असल्याचेही त्यांनी म्हटले.
-
जळगाव जिल्ह्यात आज 12 केंद्रावर पाच हजाराच्या आसपास विद्यार्थि नीटची परीक्षा
शासकीय वाहनाद्वारे सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर रवाना झाल्या आहेत. राज्यात नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर जळगाव मध्ये देखील जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. माहितीनुसार जळगावात प्रश्नपत्रिका विमानाने आल्यानंतर शहरातील एका बँकेत बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. प्रश्नपत्रिकाचे मोठ्या पोलीस बंदोबस्तात शासकीय वाहनातून परीक्षा केंद्रांवर वितरण करण्यात आले..
-
-
Re-NEET (UG) परीक्षा साठी प्रशासन सज्ज,परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त
धाराशिव येथे होणाऱ्या Re-NEET (UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. धाराशिव शहरातील परीक्षा केंद्र बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
जिल्ह्यातील ५ परीक्षा केंद्रांवर एकूण २०७२ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी CCTV, जॅमर, बसवण्यात आले आहेत या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी -
हमनुमान मंदिर दुर्घटनेबाबत मंदिराच्या ट्रस्टची स्पष्ट भूमिका
यशवाडी येथील हमनुमान मंदिर दुर्घटनेत मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष महंत शिवेंद्र चैतन्य स्वामी यांनी बांधकाम निकृष्ट दर्जाच झाल्याचे आरोप फेटाळले. मंदिरात भाविकांना दर्शनासाठी पाठवण्यासंधर्भात कंत्राट दाराकडून सुरक्षेबाबद कुठलीही सूचना देण्यात आली नसल्याचा मंदिर अध्यक्ष यांचा दावा. ठेकेदाराकडून मंदिराच्या बांधकामा संदर्भात विलंब झाल्याचं मंदिर ट्रस्ट यांच्याकडून स्पष्ट.
-
पेपरफुटीनंतर आज नीटची फेरपरीक्षा; परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा कडक पहारा
देशभरात यापूर्वी नीट परीक्षेसंदर्भात पेपरफुटी, गैरप्रकार आणि पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदाची फेरपरीक्षा अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे विशेष नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, ओळखपत्रांची काटेकोर तपासणी, प्रवेशद्वारांवर सुरक्षा तपासणी तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
-
आता कुठे ना कुठे ‘ऑपरेशन तुडवा’- आदित्य ठाकरे
राज्यात सध्या एकच खरी शिवसेना आहे, तर दुसरी केवळ गुलामांची टोळी आहे. एका चोराला मुख्यमंत्री बनवायचे आहे, म्हणूनच हा सगळा खेळ सुरू आहे. संजय राऊत यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे, आता कुठे ना कुठे ‘ऑपरेशन तुडवा’ नक्कीच पाहायला मिळणार आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
-
पोलिस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा
जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. पोलिस कवायत मैदानावर योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला. स्वतः पोलिस अधीक्षक यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमात मोठ्या संखेने सहभागी झाले. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः योग प्रात्यक्षिक करत कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे.
-
पंकजा मुंडेंनी साजरा केला योग दिवस
मी योगा करते मध्ये थोडे दिवस माझा व्यायाम बंद होता परत सुरू केला आहे. जगान योगा स्वीकारलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याची किंमत जास्त कळते पंतप्रधान मोदींनी एक वेगळा संकल्प केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या आवाजाला दर 21 तारखेला योगा दिवस करतो दररोज तो केला पाहिजे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
-
मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात
गेल्या अनेक दिवस मुंबईकर नागरिक प्रतीक्षा करत असलेल्या पावसाला आज सुरुवात झाली आहे. रविवार असल्याने मुंबईतील रस्त्यावरती आज गर्दी कमी पाहायला मिळत आहे. परंतु आज सकाळपासून सुरू झालेल्या या पावसामुळे मुंबईकर नागरिकांना उकाडापासून दिलासा मिळालेला आहे.
Maharashtra News LIVE : वीस वर्षांनंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्यातील आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ओमराजेंनी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बंडखोरी आणि ऑपरेशन टायगरबाबत मी नंतर निर्णय जाहीर करणार आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे गटात प्रवेशाची शक्यता असतानाही त्यांनी मतदारसंघात चर्चा करण्याची भूमिका घेतली. यामुळे त्यांच्यासोबत फूटून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या ५ खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे. ठाकरे गटाच्या व्हीपमुळे त्यांचे भविष्य अनिश्चित बनले आहे. या राजकीय घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.