Maharashtra News LIVE : जुहू चौपाटी आज पर्यटकांसाठी बंद, मोठा इशारा..

Maharashtra News LIVE : गेल्या दोन आठवड्यापासून दमदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने जराशी उसंत घेतली आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra News LIVE : जुहू चौपाटी आज पर्यटकांसाठी बंद, मोठा इशारा..
| Edited By: | Updated on: Jul 10, 2026 | 10:04 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Jul 2026 10:04 AM (IST)

    वेंगुर्ल्यात आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड; आजपासून पाण्याचा विसर्ग होणार

    वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील धरणाच्या भिंतीला विहिरीकडील भागात मोठे भगदाड पडलं आहे. यामुळे धरणाची भिंत फुटण्याचा धोका निर्माण झालाय. यामुळे आज शुक्रवारपासून या धरणातील पाणी साठ्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आली आहे.

  • 10 Jul 2026 09:55 AM (IST)

    आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आज कोर्टासमोर

    रुग्णालयातून थेट न्यायालयात! डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आज कोर्टासमोर; पोलीस कोठडी वाढणार की न्यायालयीन कोठडी?” डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज दुपारनंतर कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार. बुधवारी अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाल्याने म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली होती, मात्र न्यायालयाने आरोपीची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले.

     


  • 10 Jul 2026 09:50 AM (IST)

    परभणीत भेसळ युक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर

    डेअरी वरून आणलेले दूध उकळताचं झाले रबरासारखे घट्ट. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील घटना..रबरा सारखे घट्ट झालेल्या दुधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. भेसळ युक्त दूध विक्रेत्यावर कारवाई करा. नागरिकांची मागणी..

  • 10 Jul 2026 09:40 AM (IST)

    जुहू चौपाटी आज पर्यटकांसाठी बंद

    मुंबईच्या जुहू चौपाटीवर आज समुद्रात उंच भरती असल्यामुळे चौपाटी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता, संपूर्ण चौपाटीवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. कोणत्याही पर्यटकाला आत जाण्यास मनाई आहे. लाईफगार्ड आणि सुरक्षाकर्मचारी ठिकठिकाणी तैनात आहेत. आज सकाळपासूनच समुद्रात उंच भरतीची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिस आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

  • 10 Jul 2026 09:30 AM (IST)

    माऊली, माऊलीच्या जय घोषवाक्य दुमदुमून गेली पुण्यनगरी

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.. पुण्यातील भवानी पेठ येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज मुक्कामी.. सकाळपासूनच पुण्यातील नागरिक आणि वारकरी दर्शनासाठी रांगेत उभे घेत आहेत दर्शन. प्रशासनाकडून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून करण्यात आलीय व्यवस्था


  • 10 Jul 2026 09:20 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

    आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते व वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

  • 10 Jul 2026 09:06 AM (IST)

    बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

    लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, कृषी विभागाकडे आता पर्यंत 120 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे पेरणी नंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतात. अनेक कंपन्यांची बियाणे लागवडी नंतर उगवलेलेच नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे आर्थिक फटका बसला आहे. बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कार्यवाही करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथेही उन्नती कंपनीच्या बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

  • 10 Jul 2026 09:00 AM (IST)

    माऊली, माऊली च्या जय घोषवाक्य दुमदुमून गेली पुण्यनगरी

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पुण्यातील भवानी पेठ येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज मुक्कामी आहे. सकाळपासूनच पुण्यातील नागरिक आणि वारकरी दर्शनासाठी रांगेत उभे राहत दर्शन घेत आहेत. प्रशासनाकडून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 10 Jul 2026 08:50 AM (IST)

    फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड टाकली. 3 हजार 500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली. 1 लाख 32 हजार रुपयांचे संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळे ठोकण्यात आले.हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि गुजरातमधील पंचमहल दूध संघाला पुरवल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

     

  • 10 Jul 2026 08:40 AM (IST)

    हतनुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

    जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 9 पर्जन्यमापन केंद्रांवर मागील 24 तासात एकूण 284.4 मि.मी आणि सरासरी = 31.6 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाल्याची माहिती हतनूर प्रशासनाने दिले आहे सध्या स्थितीत धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे

  • 10 Jul 2026 08:30 AM (IST)

    आजपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले

    आजपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येत आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद होता. आज सकाळपासून भाविकांना नियमित दर्शनाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सहा तालुक्यांतील शाळाही आजपासून नियमितपणे सुरू होत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे.

  • 10 Jul 2026 08:20 AM (IST)

    बोगस बियाणांचा शेतकऱ्यांना मोठा फटका

    लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, कृषी विभागाकडे आता पर्यंत 120 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे पेरणी नंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतात. अनेक कंपन्यांची बियाणे लागवडी नंतर उगवलेलेच नाही,त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे आर्थिक फटका बसला आहे. बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कार्यवाही करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथेही उन्नती कंपनीच्या बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

  • 10 Jul 2026 08:10 AM (IST)

    सांगली धरण परिसरात आणि जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णेच्या पाणी पातळीत कमालीची घट

    सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेत घट झाली असून कृष्णा नदीची पाणी पातळी मध्ये कमालीची घट झाली आहे. रात्री 30 फुटावर गेलेली कृष्णा नदी आता नदीची पाणीपातळी सकाळी 25 फूट 6 इंच झाली आहे. त्यामुळे सांगली कराना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसां पासून पडत असणारा पाऊस यामुळे कृष्णा नदी मध्ये कमालीची वाढ होत होती. काल 30 फुटावर नदीची पाणी पातळी गेली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने नदीची पाणीपातळी आता घटू लागली आहे.

  • 10 Jul 2026 08:01 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस

    आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते व वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

    भूस्खलनग्रस्त भागांची पाहणी करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधून धीर दिला. तसेच एकही शेतकरी किंवा बाधित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे अचूक पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून थैमान घातले होते. मुंबई, ठाणे, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, विदर्भ आणि उर्वरीत राज्यातील अनेक भागात कोसळधार दिसली. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसले. संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील पाच सहा खासदार अस्वस्थ असल्याचे मोठे विधान केले आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने पुण्यनगरी दुमदुमली. टीईटी घोटाळ्यात अजून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे रेल्वे वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दुरुस्ती आणि इतर कामासाठी डेक्कन क्वीनसह काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Follow Us