डोक्याला मुंग्या आल्याशिवाय राहणार नाहीत, इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे पुन्हा भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट..
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकताच भारताबद्दल पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून भारतीयांना न पटणारे विधान केले जात आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम करार इस्त्रायलला सुरूवातीपासूनच मान्य नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काही दिवसांपूर्वीच भारताबद्दल धक्कादायक विधान केले होते. त्यांनी भारताला छोटा देश म्हटले होते. आता पुन्हा एकदा बेंजामिन नेतन्याहू भारताबद्दल बोलताना दिसले आहेत. यावेळीही डोक्यातून मुंग्या निघणारे विधान त्यांनी भारताबद्दल केले. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी नुकताच एक मुलाखत दिली. यादरम्यान त्यांनी भारताचे नाव घेतले. बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, आपल्याला नवीन गठबंधन आणि नाते तयार करावे लागतील. यावेळी हे काम मी भारतासोबत करत आहे.
जेडी वेंस यांच्या टीकेला उत्तर देखील त्यांनी दिले. आमच्याकडे काही मित्र आहेत, ज्यामध्ये छोटासा देश भारत देखील आहे. यांच्याकडे 1.4 अरब लोक आहेत… आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावा मला तिथून जोरदार समर्थन मिळत आहे. इराणसोबतच्या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले आहेत. 28 फेब्रुवारीला मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळूनच इराणवर केला होता.
मात्र, युद्ध जसे जसे पुढे जात आहे, तसे या दोन मित्रांमधील तणाव वाढला. त्यामध्येच बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून वारंवार भारताला छोटा देश म्हणून बोलले जात आहे. भारत हा जगाच्या पाठिवरील मोठ्या देशांपैकी एक नक्कीच आहे. भारतीय अर्थव्यवस्था देखील मोठी आहे. मात्र, बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून भारताला सातत्याने छोटा देश म्हटले जात आहे.
भारतीय लोकांना बेंजामिन नेतन्याहू यांचे बोलणे अजिबात आवडत नाहीये. इस्त्रायल आणि भारत यांच्यातील संबध नक्कीच चांगले आहेत. मात्र, भारतातला सातत्याने छोटा देश म्हटले जात आहे. बेंजामिन नेतन्याहू यांच्या या विधानावर भारतातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारत हा तटस्थ भूमिकेत होता. युद्ध थांबावे हीच भारताची इच्छा होती. होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले.
