
नाशिकमधील साबुदाणा वड्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेले सायंतारा हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. शहरात गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले असून, हॉटेलच्या बाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, उपवास असलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी केवळ उद्या आणि परवा हे हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. प्रसिद्ध खाद्यपेय केंद्रांनाही गॅस अभावी कुलूप लावावे लागत असल्याने नाशिककर खवय्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सोलापूर शहरात सध्या कमर्शियल गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी आता पारंपरिक चुलींचा आधार घेतला आहे. यामुळे लाकडाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने लाकडाच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, एका मणामागे तब्बल १०० रुपयांची दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात हा तुटवडा व्यवसायावर परिणाम करत असल्याने, सरकारने तातडीने गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या २२ कंत्राटदारांना मोठा दणका दिला आहे. विहित मुदतीत कामे न केल्यामुळे या कंत्राटदारांना प्रति दिवस १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम त्यांच्या देयकातून (बिल) वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रलंबित कामांना काही अटींसह मुदतवाढ देण्यात आली असली तरी, सर्व कामे गुणवत्तापूर्ण असणे अनिवार्य असल्याचे महापात्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, कामात हलगर्जीपणा झाल्यास केवळ कंत्राटदारच नव्हे, तर संबंधित विभागप्रमुखांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
मंठा येथे एका पोलीस निरीक्षकासह पोलीस अंमलदाराला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पोलिस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि पोलीस अंमलदार रवी जाधव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वाळू वाहतुकीच्या हायवावर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता आणि सुरळीत चालवण्यासाठी केली होती लाचेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
काल अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर; काल अमरावती 42.2 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद. नागरिक सकाळी नऊ वाजताच्या आधी घराबाहेर पडत असतानाही नाही तोंडाला टॉवेल आणि स्कार्फ बांधूनच पडताय बाहेर. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचे हे तापमान जास्त असल्याची माहिती. मार्च महिन्यातच विदर्भात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे..उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असल्याचे चित्र आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम माणिक चाटे याला जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. दिवंगत भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी आज 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला. आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर केली आहे.
जीएसटी विभागाचे कर उपआयुक्त सोमनाथ पागे राज्यकर सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोदे यांचाही जामीन अर्ज नामंजूर. खाजगी पंटर अमित जाधव याचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. लाचखोर अधिकाऱ्यांना मोठा झटका. जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. २० लाख रुपयांची लाच घेताना मुंबईच्या एसीबीने केली होती कारवाई. कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून मागितली होती 1 कोटी 25 लाख रुपयांची लाच. पहिला 20 लाखांचा हप्ता घेताना एसीबीने जीएसटी अधिकाऱ्यांवर केली होती कारवाई
गॅस एजन्सी उघडण्याच्या आधी पासूनच नागरिकांची लावली लंबी लाईन. मोठ्या प्रमाणात लंबी लाईन. प्रशासनाने गॅस चा तुटवडा नसल्याचं वारंवार सांगून सुद्धा नागरिकांच्या लागत आहे रांगा. सिलेंडर ची उपलब्धता आहे मात्र ऑन लाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहे ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे सिलेंडर च्या चिंतेत नागरिक स्वतःच एजन्सी मध्ये सिलेंडर घेण्यासाठी पोहचत आहे
विधानसभेत आज अर्थसंकल्पीय मागण्यांवरती चर्चा होणार आहे. या चर्चा पूर्ण झाल्यानंतर सभागृहात मान्य होतील. विरोधकांचा 293 च्या प्रस्तावावरती काल चर्चा होऊ शकली नाही,त्यामुळे आज यावरती चर्चा होणार आहे. या चर्चदरम्यान विरोधक अजित पवारांच्या अपघाती निधना संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये गॅस नसल्याने चहाच्या टापर्यांवर आता कोळसा वापरला जातोय नाशिकच्या अनेक टपऱ्यांवर आता कोळसा चहा विक्री होत आहे. गॅस तुटवड्यावर आता चहा विक्रेत्यांनी नवीन फंडा शोधून काढला आहे. गॅस पेक्षा देखील कोळसा स्वस्त आहे. तसेच छोट्या जागेत चूल होत नसल्याने चुलीला देखील कोळशाचा पर्याय मिळाला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस चंद्रपूर शहरातील काही भागांत पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत राहणार आहे. या कालावधीत नगीना बाग, चोर खिडकी, चपराशी कॉलनी, दादमहल वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, अंचलेश्वर वॉर्ड, महाकाली वॉर्ड, भिवापूर वॉर्ड, बैलबाजार, रामाळा तलाव रोड, बगड खिडकी, जलनगर वॉर्ड, जटपुरा वॉर्ड, हॉस्पिटल वॉर्ड, बाजारवॉर्ड, एकोरी मंदिर वॉर्ड, ख्रिश्चन कॉलनी, पंचशील चौक, रामनगर, बोकारे प्लॉट, राष्ट्रवादी नगर, आंबेडकर सभागृह नगर, ठक्कर कॉलनी, सिस्टर कॉलनी तसेच जगन्नाथ बाबानगर या परिसरातील पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.
जनआरोग्य योजनेतील रुग्णांकडून जादा पैसे वसूल करणाऱ्या यवतमाळमधील चार रुग्णालयांना दंड ठोठावण्यात आला.यवतमाळ जिल्ह्यात जन आरोग्य पथकाने ही कारवाई केली आहे. यवतमाळ मधील नामवंत क्रीटीकेयर हॉस्पिटल 1 लाख 1 हजार 700 अगस्थ्य ऑर्थपेडिक हॉस्पिटल 75 हजार, चिंतामणी हॉस्पिटल 3 लाख 40 हजार , महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 18 हजार असा दंड जिल्हाधिकारी यांच्या कडे सुनावणी होऊन ठोठावला
विदर्भात सध्या उष्णतेची लाट मात्र उद्यापासून अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अमरावती काल राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले, गुरुवारी तब्बल 42.2 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. मात्र उद्यापासून विदर्भात तापमानात बदल होऊन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे
रमाई घरकुल योजनेत कसा भ्रष्टाचार केला जात आहे असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. कशा प्रकारे बोगस कागदपत्रे तयार केली जातात हे त्यांनी दाखवले. ही कागदपत्रे आपल्याला अज्ञात व्यक्तीने पाठवले असल्याचे जलील यांनी सांगितले. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसील मधून काढले जातात. एकनाथ शिंदे यांचे बोगस रहिवाशी प्रमाणपत्र ही इम्तियाज जलील यांनी दाखवले
मुंबईतील मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसेच्या वतीने आज मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सींना निवेदन देण्यात आले. सध्या भारताबाहेर सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा आधार घेत काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असल्याचे मनसेने सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा पुरवठा वेळेत आणि नियमानुसार करावा, अशी मागणी करण्यात आली.
गॅसअभावी अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होण्याची राज्यात वेळ आली आहे. अनेक शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सने वेळेत बदल केला आहे. तर काहींनी थेट हॉटेल्स बंद ठेवल्या आहेत. काही जणांनी चूल पेटवली आहे. तर दुसरीकडे गॅससाठी ग्राहकांची कसरत अद्याप थांबलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून गॅस एजन्सीबाहेर सातत्याने लांबच लांब रांगा दिसून येत आहे. भर उन्हात ग्राहक गॅस सिलेंडर टाकी घेऊन एजन्सीबाहेर बुकिंगसाठी थांबलेले आहेत. तर सरकारने नैसर्गिक गॅस संकट लवकरच दूर होण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने 40 हून अधिक देशांकडून गॅस आयात करण्यास सुरूवात केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ईकेवायसी प्रक्रियेचा फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. काही बोगस लाभार्थी समोर आले आहे. तर जवळपास 60 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विदर्भात आज हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं कळेल