Maharashtra News LIVE : झोमॅटो, स्विगीचे पार्सल घेऊन जाणारे सर्व मराठी बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल
Maharashtra News LIVE Updates: 1 मे पासून मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आली आहे. पण त्यावरून राजकीय आखाडा तापला आहे. महायुतीतील खडाजंगी दरम्यान आता शिंदेसेनेतील धुसफूसही समोर आली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात कडाक्याच्या उन्हापासून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्याची भन्नाट शक्कल; तागाच्या झाडांचा ‘नॅचरल फिल्टर’
जळगाव जिल्ह्यात वाढत असलेल्या तापमानाचा फटका केळीच्या बागांना बसू नये म्हणून एका शेतकऱ्याने केळीच्या रोपांशेजारी तागाची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग राबवला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे केळीची पाने करपून रोपांचे मोठे नुकसान होते, मात्र तागाच्या झाडांमुळे रोपांना सावली मिळून बागेत ओलावा आणि थंडावा कायम राहतो. या पद्धतीमुळे केळीच्या रोपांची वाढ जोमाने होत असून उन्हाळ्यानंतर या तागाचा उपयोग गुरांचा चारा आणि सेंद्रिय खत म्हणूनही करता येणार आहे. वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही दिशादर्शक ठरत आहे.
-
झोमॅटो, स्विगीचे पार्सल घेऊन जाणारे सर्व मराठी बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल
मराठी सक्तीवरुन रिक्षा-टॅक्सी चालकांचा वाद विकोपाला गेला आहे. यावेळी नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली. फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालकांना बेसिक मराठी भाषा शिकवा. झोमॅटो, स्विगीचे पार्सल घेऊन जाणारे सर्व मराठी बोलतात का? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.
-
-
जळगावात 12 वीच्या विद्यार्थ्याची शेतात आत्महत्या, मित्रांसोबतचा वाद जिव्हारी लागला
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बारावीत शिकणाऱ्या भावेश अर्जुन माळी या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत शेतात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामनेर बस स्थानक परिसरात काही विद्यार्थ्यांशी झालेल्या वादातून भावेश प्रचंड मानसिक तणावाखाली होता. हा वाद जिव्हारी लागल्याने त्याने कढोली शिवारातील शेतात जाऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जामनेर पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
-
उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार का? संजय राऊत म्हणाले…
विधानपरिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांनी उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली. मविआच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षांशी आम्ही चर्चा केली, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली
-
भोंदू अशोक खरातने केलेल्या बेकायदेशीर गर्भपातांचा शोध सुरु, ३ ते ४ डॉक्टर एसआयटीच्या रडारवर
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटी (SIT) कडून कसून तपास केला जात आहे. खरातने आतापर्यंत किती महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केले, तो किती दिवसांचा गर्भ होता आणि हे करताना कायदेशीर नोंदणी केली होती का, या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोणतीही अधिकृत नोंदणी न ठेवताच हे गर्भपात केले गेल्याचा संशय असून, या प्रकरणात नाशिकमधील ३ ते ४ बडे डॉक्टर देखील एसआयटीच्या रडारवर आले आहेत. या शोधमोहिमेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
-
-
जामनेरमध्ये भीषण अपघात: ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दांपत्य जागीच ठार; १ वर्षाची चिमुकली बचावली
जामनेर येथील तोरणाळा स्मशानभूमीजवळ रात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ५० वर्षीय गोपाल वासुदेव खडके आणि ४५ वर्षीय सोनाली गोपाल खडके या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने या घटनेत त्यांच्यासोबत असलेली एक वर्षाची चिमुकली सुखरूप बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत.
-
शिवसेना ठाकरे गट झाला आक्रमक
ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर भागात काल शिवसेना ठाकरे गट आरोग्य कंटेनरला अडवल्यानंतर मोठा वाद झाला होता… शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आली होती… पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला… अखेर आरोग्य कंटेनर ज्ञानेश्वर नगर नाना नानी पार्क या ठिकाणी बसवण्यात आले आहे… हेच आरोग्य कंटेनर शौचालयाच्या बाजूला आणि नाना नानी पार्क लहान मुलांच्या खेळण्याच्या जागेवरती असल्या कारणास्तव हटवण्याची मागणी ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खुस्पे आणिं स्थानिकानी केली होती…मात्र महापालिकेने केलेला सर्वे आणि परवानगी पाहता पोलिसांनी आरोग्य कंटेनर बसवले.
-
बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार
बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊसतोड मजूर महिलांवर कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याने अक्षरशः खाली झोपवून उपचार देण्यात येत आहेत. हा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या या रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही वरिष्ठांना कळविलेले आहे अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
-
बीडच्या उमापूर गावामध्ये पोलिसांसमोरच दोन गटात तुंबळ हाणामारी
किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेला. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. गेवराई तालुक्यातील उमापूर या गावामध्ये, तू माझ्या घराच्या समोर दारू का पितोस असा जाब विचारत शिवीगाळ करून लाठ्या काठ्याने मारहाण. रात्री झालेल्या वादानंतर सकाळी पुन्हा पोलिसांसमोरच दोन गट भिडल्याचे समोर आले आहे.
-
गुणरत्न सदावर्ते यांना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
मिरा भाईंदर मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांन वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अविनाश जाधव आज नवघर पोलीस ठाण्यात येणार आहेत. मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांना भेटायला आलेल्या गुणरत्न सदावर्तेंना मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.
सदावर्ते यांनी राज ठाकरेंबद्दल केलेल्या एकेरी भाषेतील वक्तव्यामुळे मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि इतर पदाधिकारी आक्रमक झाले होते. कालच्या राड्यानंतर नवघर पोलिसांनी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांन वरती गुम्हे दाखल केले असून आज सकाळी ११ वाजता त्यांना चौकशी साठी बोलावण्यात आले आहे
-
उच्च शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पंढरपुरातील विद्यार्थिनींना मोठा आर्थिक फटका
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मधील एआय आणि मास कम्युनिकेशन कोर्सेसचा महाडीबीटी पोर्टल मध्ये समावेशच नाही. त्यामुळे मुली शिष्यवृत्तीपासून वंचित. गेल्या दोन वर्षांपासून फी भरूनच मुलींना शिक्षण घ्यावं लागतंय. राज्यातील अनेक कॉलेजमध्येही अशीच परिस्थिती. महाविद्यालयाने वारंवार प्रस्ताव पाठवूनहीं कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. उच्च शिक्षण विभागाचा हलगर्जी कारभार उघड. विद्यार्थिनींची मागणी – तात्काळ शिष्यवृत्ती लागू करा!…….
-
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशी ही सुरूच
परिचारिकेच्या संपामुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढला 8 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचे आंदोलन सुरू. प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. रुग्नेसेवेसाठी नरसिंगच्या विद्यार्थिनींची मदत, संप सुरूच राहिला तर अडचणी वाढण्याची शक्यता. जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागणीसाठी आंदोलन.
-
नाशिक आयटी कंपनीतील आरोपींना न्यायालयात हजर करणार
नाशिक मल्टिनॅशनल कंपनी अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपींना चौथ्या गुन्ह्यात आज नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयित आरोपी तौसिफ आत्तार, दानिश शेख ,शाहरुख कुरेशी ,रजा मेमन यांना एसआयटीने नाशिक मध्यवर्ती कारागृहातून काल ताब्यात घेतले होते. आज दुपारच्या सुमारास संशयतांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी 29 तारखेला सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी काल सुनावणी होऊ शकली नाही. आता या प्रकरणी 29 एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी तारीख पे तारीख मिळत आहे. आता 29 तारखेला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
वसई-विरारमध्ये निर्जळी?
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जवळील शीरसाड येथे एका कंटेनर वाहनाचा अपघात होवून , त्या वाहनाने वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला जोरदार धडक दिल्याने वसई विरारला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे आता वसई विरार ला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र वसई विरार महापालिका पाईप लाईन दुरुस्ती चे काम युध्दपातळीवर करणार असल्याचं महापौर आजीव पाटील यांनी सांगितलं आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून आकाश ढगांनी दाटून आले आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उष्णतेपासून दिलासा मिळाला. मात्र वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-
अजून एका भोंदूला अटक
भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लैंगिक शोषण व जादू टोणाच्या गुन्ह्यात लासलगाव पोलिसांनी रात्री दीड वाजता अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 25 तासानंतर या महेश गिरी भोंदू बाबाला अटक करण्यात आली. आजभोंदू महेश गि रीला निफाड येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. पुढील तपासासाठी लासलगाव पोलिसांकडून पाच ते सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे महेश गिरीचे मठ आहे.
-
नेस्को ड्रग्स प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन
काल अटक झालेली जिया जेकब ही फिल्म इंडस्ट्रीत साईड एक्टर आहे. एक्टिंगसह जिया जेकब मॉडेलिंग करते. जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्स्क्शन समोर आले आहे. नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून तिला पैसे पाठवले गेले. जियाने अमली पदार्थ पुरवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना गळ?
महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हेच चेहरा असण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची भेट घेतली. एक जागा महाविकास आघाडीकडे असावी आणि मतांमध्ये फूट पडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सातत्याने पुढे आणले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून काल मोठा राडा झाला. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकांना शिव्या घातल्या. धमकीही दिली. त्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. तर 1 मेपासून मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी बोलणे अनिवार्य करण्यात येत आहे. त्यावरूनही राजकारण तापले आहे. महायुतीत खडाजंगी सुरू असतानाच शिंदे सेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाविरोधात दवंडी दिली आहे. काल बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. त्यासोबतच तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व मतदान झाले. हे मतदान आता कुणाच्या पारड्यात जाते, सत्ता बदल होतो का? याची चर्चा रंगली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर राज्य सरकार काय तोडगा काढते हाही कळीचा मुद्दा आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाचा