
रोहित पवार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी ते अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ते शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंशी चर्चा करत आहेत.
भंडारा–गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू झाली आहे. याप्रकरणी एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. हे पथक संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करणार असून संबंधितांची कसून चौकशी, पुरावे संकलन आणि दोषींवर कठोर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विधीमंडळ सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती राम शिंदे हे नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या नावांची यादी घेऊन रविंद्र चव्हाण हे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून राज्यसभेच्या चार जागांसाठी २४ जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. आता दिल्लीतील वरिष्ठ नेते या २४ नावांमधून ४ नावे फायनल करणार आहेत.
अजित दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमान अपघातप्रकरणी DGCA आज प्राथमिक अहवाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात हिंदीसक्ती करु नये. त्रिभाषा सूत्रीसाठी केंद्रातून दबाव टाकला जातो. सरकारी कागद काहीही म्हणो, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विधीमंडळात कागद कसले दखावता, मराठी शाळा बंद का पडतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित आहे.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे आशा सेविकांना आरोग्यसेविकेकडून मारहाण झाल्याचा आरोप आशासेविकांना केला आहे. आम्हाला बैठकीला बोलवून आरोग्य सेविकांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप आशा सेविकांनी केला आहे. यानंतर आशासेविकांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून मारहाण करणाऱ्या आरोग्य सेविकेचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी केली आहे. आशासेविकांकडून आरोग्य सेविका पैसे मागत असून पैसे न दिल्याच्या कारणांनी ही मारहाण झाल्याचा आरोप आशा सेविकांनी केला आहे.
बदलापूर पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी बस चालकाविरोधात पोस्को आणि ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी २८६.२५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून नदीचे रुंदीकरण, प्रदूषण नियंत्रण आणि गाळ उपशाची कामे केली जाणार आहेत. गाळ उपशासाठी नवा आराखडा: यावर्षी गाळ काढण्यासाठी ३८ कोटी रुपये खर्च होणार असून, जुन्या कंत्राटदारांमधील वादानंतर आता नव्याने निविदा काढल्या जाणार आहेत.
मालाडमधील रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या अनधिकृत झोपड्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या झोपड्या हटवण्यास पश्चिम रेल्वेला हिरवा कंदील दिला आहे. रेल्वेला परवानगी: मुंबई सेंट्रल-बोरीवली या ६ व्या लोहमार्गालगतच्या बेकायदा झोपड्या हटवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
नाशिक मध्ये आयोजित विश्व मराठी संमेलनाला लावणार उपस्थिती. कालपासून विश्व मराठी संमेलनाला झाली आहे सुरुवात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज कार्यक्रमांना हजेरी लावणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज निघणार दिंडी. नाशिक मध्ये आज कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. सकाळपासूनच कार्यक्रमांना होणार सुरुवात
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंधेरी सबवे बाबत लक्षवेधी उपस्थित केली जाणार आहे. शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मुर्जी भाई पटेल लक्षवेधी मांडतील. अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्वसाठी जोडला जाणारा एकच सबवे असून पावसाळ्याच्या काळात पाणी साचल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास होतो. प्रत्येक अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन मार्ग काढण्यात येईल असा आश्वासित केलं जातं पण तरी देखील काहीच हालचाली होत नाहीत
संगमनेर तालुक्यातील निझर्णेष्वर देवस्थान येथे आंदोलकांचा मुक्काम. आंदोलनाच्या तोडग्यासाठी शासकीय हालचालींना वेग. शिष्टमंडळ आणि प्रशासनामध्ये महत्त्वाची बैठक अपेक्षित. चर्चेनंतरच पुढील दिशा ठरणार. तोडगा न निघाल्यास लोणी येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या गावाकडे मोर्चा. लाल वादळ लोणीकडे धडकणार का ? सर्वांचे लक्ष चर्चेकडे….
गेले दोन दिवसा पूर्वी 172 वर असलेला मुंबईचा AQI थेट शंभराच्या आसपास आहे. तर उपनगरांमध्ये 100 च्या आत नोंद झाली आहे. मुंबई व आसपासच्या शहरात तर प्रदूषण कमी होताच दादर चौपाटी परिसरात मोठा फरक; आकाशात ढग स्पष्ट दिसू लागले. 24 तारखेला मुंबई व उपनगरात 172 AQI असलेला निर्देशांक आज भायखळा आणि दादर परिसरात 90 ते 120 दरम्यान तर उपनगरात 50 ते 100 AQI ‘मध्यम’ श्रेणीत आहे. आरोग्यावरील धोका तुलनेने कमी झाला आहे.
रात्रीच्या उकाड्या पासून नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात वातावरणात सातत्याने बदल आहे.कमान आणि किमान तापमानांमध्ये दोन दिवसात मोठा फरक दिसत आहे. किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअस आहे. सायंकाळच्या सुमारास पुन्हा गारवा निर्माण झाल्याने वातावरणात बदल दिसत आहे. पुढचे काही दिवस वातावरण असेच बदलेल अशी शक्यता आहे.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंधेरी सबवे बाबत लक्षवेधी उपस्थित केली जाणार आहे. शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मुर्जी भाई पटेल लक्षवेधी मांडतील.अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्वसाठी जोडला जाणारा एकच सबवे असून पावसाळ्याच्या काळात पाणी साचल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास होतो. प्रत्येक अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन मार्ग काढण्यात येईल असा आश्वासित केलं जातं पण तरी देखील काहीच हालचाली होत नाहीत. आजच्या होणाऱ्या अंधेरी सबवे लक्षवेधी वर काही कायमस्वरूपी तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
कुसुमाग्रज जयंती निमित्त आजपासून महापौरांचे नमस्कार नाशिककर हे अभियान कौतुकाचा विषय ठरत आहे. प्रत्येक महिन्याला महापौर नाशिककरांना पत्र लिहिणार आहे. पत्रामध्ये शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा देणार आहेत.नाशिककरांच्या सूचना देखील मागवून घेणार आहे. नाशिककरांची संवाद साधण्यासाठी महापौरांचा नवा उपक्रम कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आजपासून सुरू होत आहे.
कंत्राटदारांनी प्रयत्न केल्यास पुढील २ आठवड्यात जॅकवेलमधून २०० एमएलडी पाणी उपसा सुरू होऊ शकतो. त्यापैकी १७६ एमएलडी पाणी महापालिकेला मिळेल. त्यातून ८० टक्के शहराला २ दिवसांआड पाणी पुरवठा करता येईल, असे निवेदन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी केले.
पुण्याच्या भोर तालुक्यात महाबीजच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकरी गटांना देण्यात आलेले परभणी शक्ती हे ज्वारी बियाणे निकृष्ट निघाले. पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच न झाल्याने ज्वारी तर नाहीच शिवाय गुरांच्या चाऱ्यासाठीचा कडबा देखील उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या निकृष्ट बियाणांमुळे अख्खा रब्बी हंगामचं वाया गेल्यानं शेतकऱ्यांना एकरी 45 ते 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे..
मालाडमधील रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या अनधिकृत झोपड्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या झोपड्या हटवण्यास पश्चिम रेल्वेला हिरवा कंदील दिला आहे. मुंबई सेंट्रल-बोरीवली या ६ व्या लोहमार्गालगतच्या बेकायदा झोपड्या हटवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आपल्याला अद्याप कोणताही मदत मिळाली नसल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. तर रोहित पवारांना गुन्हा दाखल करायचा नाही तर स्टंट करायचा असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. दादांच्या अपघाताला सरकार हलक्यात घेत असल्याचा आरोप काल संजय राऊत यांनी केला होता. दादांचा विमान अपघात की घातपात यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे समोर येत आहे. तर अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल येत्या 28 फेब्रुवारीपूर्वीच येणार असल्याचे समजते.सुनेत्रा पवार यांची काल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बारावीचा फिजिक्स, केमिस्ट्रीनंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याने खळबळ उडाली. तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. तर अवकाळी पावसाने मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान केलं. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत.