AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada Rain : मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळाचा हाहाकार, 48 तासात 10 जणांचा मृत्यू , शेकडो जनावरं दगावली

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सोमवारी रात्री कहर माजवला. गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात 10 जणांनी जीव गमावला आहे.

Marathwada Rain : मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळाचा हाहाकार, 48 तासात 10 जणांचा मृत्यू , शेकडो जनावरं दगावली
मराठावड्यात पावसाचा हाहाकार
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 6:43 PM
Share

औरंगाबाद: गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सोमवारी रात्री कहर माजवला. गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात 10 जणांनी जीव गमावला आहे. बीड जिल्ह्यात 3, उस्मानाबाद आणि परभणीत 2, जालना,नांदेड आणि लातूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यासाठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात गेल्या 48 तासात 10 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय 200 जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी घरांचं नुकसान झालं आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड जालना आणि हिंगोलीमध्ये पावसामुळं शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 180 मंडळात 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

धरणांतून पाणी सोडलं

गेल्या 48 तासात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातील छोट्या मोठ्या धरणांतून पाणी सोडण्यात आलं आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील 28 घरं आणि 25 झोपड्यांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे औरंगाबादमधील 11,बीडमधील 12, जालना जिल्ह्यातील 5 घराचं नुकसान झालं आहे.

मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण मराठवाड्याला फटका बसला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन असून नुकसानाचं प्रमाण कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं जयंत पाटील म्हणाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळं औरंगाबाद  शहरालाही फटका बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले.

उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर पाचारण

उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 6 मजुरांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. यात 2 लहान मुले , 2 महिला व 2 पुरुषांचा समावेश आहे हे कामगार गेल्या 36 तासापासून पुरात अडकले होते त्यांना अखेर सुखरूप बाहेर काढले आहे. हे कामगार नांदेड जिल्ह्यातुन कामाला आले होते. जिल्ह्यातील 37 जण पुराच्या पाण्यात अडकले होते त्यापैकी 23 जणांना बाहेर काढले आहे. NDRF पथक व पुणे येथून आलेले सरक्षण विभागाचे हेलिकॉप्टर यांनी मदतीने जीव वाचविले.

लातूर जिल्ह्यातील डिगोळ-देशमुख येथे पुरात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. कळंब तालुक्यातील वाकडी येथील शेतातील घरात अडकलेल्या  17 जणांना  सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. घनसरगाव येथील अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लातुर तालुक्यातील शेतावर पुरात अडकलेल्या 22 जणांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे

इतर बातम्या:

Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?

Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, बीड, हिंगोलीसह सोलापूर अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग

Maharashtra Rain Ten people died in heavy rains and floods in Marathwada region over the last 48 hours

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.