AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिचा नकार जिव्हारी लागला, तरूण थेट मोबाईल टॉवरवरच चढला ; कुठे घडला हा थरारक प्रसंग ?

प्रेमात आंधळ्या युवकाने पुढे-मागे काहीच न पाहता जे कृत्य केलं त्याने अख्खं गाव हादरलं. प्रेमात आंधळा होऊन तो स्वत:चं आयुष्य संपवणार होता. आणि त्यासाठी कारण काय तर त्याचं ज्या तरूणीवर प्रेम होतं तिने त्याला नकार दिला.

तिचा नकार जिव्हारी लागला, तरूण थेट मोबाईल टॉवरवरच चढला ; कुठे घडला हा थरारक प्रसंग ?
| Updated on: Nov 22, 2023 | 1:22 PM
Share

शाहिद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 22 नोव्हेंबर 2023 : प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात. म्हणजे अगदी खराखुरा नव्हे पण सारासार विचार करण्याची त्याची बुद्धी कमी होते. पुढचा मागचा काहीच विचार करत नाही. फक्त प्रेम एके प्रेमच.. अशाच एका प्रेमात आंधळ्या युवकाने पुढे-मागे काहीच न पाहता जे कृत्य केलं त्याने अख्खं गाव हादरलं. प्रेमात आंधळा होऊन तो स्वत:चं आयुष्यचं संपवणार  होता. आणि त्यासाठी कारण काय तर त्याचं ज्या तरूणीवर प्रेम होतं तिने त्याला नकार दिला. तिच्या नकारामुळे खचलेल्या त्याने थेट 300 फुट मोबाईल टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केला.

अखेर पोलिसांनी कसून प्रयत्न करत त्या तरूणाला खाली उतरवून त्याचे प्राण वाचवले. पोलिसांनी या प्रकरणी अतिशय काळजीपूर्वक ही घटना हाताळणी याबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. त्याच्या या स्टंटमुळे अनेकांना शोलेमधल्या धर्मेंद्रच्या सीनची आठवण झाली.

एका नकाराने तो खचलाच आणि थेट…

देवरी तालुक्यातील चिंचगड येथील ही घटना आहे. तेथे राहणारा दिपक कुमार रजन कुंजाम (वय 24) या तरूणाचे छत्तीसगड राज्यातील तरुणीवर प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठीही विचारले, मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. यामुळे तो निराश झाला आणि गावातील मोबाईल टॉवर चढून त्याने त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती स्थानिकांनी चिचगड येथील पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार शरद पाटील व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्या तरूणाशी मोबाईलवरू संपर्क साधला. तब्बल चार तास पोलिस त्या तरूणाची मनधरणी करत समजूत काढायचा प्रयत्न केला. पण तो तरूण कुणाचेच, काहीही ऐकत नव्हता. अखेर ठाणेदार शरद पाटील यांनी स्वत:च त्या तरूणाचे प्राण वाचवायचे ठरवले. त्यांच्या आदेशानुसार, इतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत, त्याला मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवलं. आणि स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला आवश्यक असलेल्या इतर वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या तरुणाला चार तासांनी टॉवरवरून खाली उतरवत त्याचा जीव वाचवला.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?