AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबाचं मोठं पाऊल, सुनेत्रा पवारांच्या पत्राने खळबळ

अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक किंवा नवीन उपक्रम राबवताना आता त्यांच्या कुटुंबियांची लेखी परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी यासंदर्भात राज्यातील सर्व कार्यालयांना आदेश जारी केले आहेत.

अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबाचं मोठं पाऊल, सुनेत्रा पवारांच्या पत्राने खळबळ
ajit pawar sunetra pawar
| Updated on: Mar 11, 2026 | 8:33 AM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या आठवणी जपण्यासाठी किंवा त्यांच्या नावाने कोणतेही नवीन उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची अधिकृत लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व सार्वजनिक संस्था आणि नोंदणी कार्यालयांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जनमानसात असलेल्या त्यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक ठिकाणी त्यांचे स्मारक उभारणे, त्यांच्या नावाने ट्रस्ट सुरू करणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे किंवा शासकीय-निमशासकीय योजनांना त्यांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, या प्रक्रियेत सुसूत्रता असावी आणि त्यांच्या नावाचा कोणताही चुकीचा वापर होऊ नये, या उद्देशाने पवार कुटुंबियांच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी यासंदर्भात राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना एक अधिकृत पत्र दिले आहे. या पत्रात एक महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. अजितदादांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने कुठेही त्यांचे स्मारक उभारणे, नवीन संस्था स्थापन करणे किंवा कोणताही उपक्रम राबवताना पवार कुटुंबियांची लेखी परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे अनिवार्य असेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सुनीलकुमार मुसळे यांच्या पत्राची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही केली आहे. आयुक्तांनी राज्यातील सर्व धर्मादाय उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयांना हे पत्र कळवले आहे. तसेच, हे निर्देश सर्व सार्वजनिक संस्थांच्या माहितीसाठी कार्यालयातील नोटीस बोर्डावर ठळकपणे लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे आता कोणत्याही नवीन ट्रस्टची नोंदणी करताना किंवा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या नावाचा वापर करताना कुटुंबियांची सहमती असल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. अजितदादांच्या कार्याचा वारसा जपताना त्यात पारदर्शकता राहावी आणि त्यांच्या नावाचा आदर राखला जावा, हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.