‘जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना….ही धमकी नाही तर’, मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेवर सभेतून हल्ला

मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग धनंजय मुंडे यांना पाहतो. धनंजय मुंडे हे त्यांचे पाप लपवण्यासाठी ओबीसीचे पांघरुन घेत आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

'जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना....ही धमकी नाही तर', मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेवर सभेतून हल्ला
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 4:09 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धारशिवमधील आक्रोश मोर्चातून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. गाठ मनोज जरांगे यांच्याशी आहे. २५ जानेवारीनंतर तुमची मस्ती उतरवणार, असे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना थेट म्हटले आहे. मनोज जरांगे जाहीर भाषणात म्हणाले, जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे. धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा. ही धमकी नाही तर सावध करत आहे. यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. तुमचे पाप झाकण्यासाठी पांघरुन घेऊ नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

२५ तारखेनंतर सोडणार नाही

मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग धनंजय मुंडे यांना पाहतो. धनंजय मुंडे हे त्यांचे पाप लपवण्यासाठी ओबीसीचे पांघरुन घेत आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

हा मकोका आम्हाला अमान्य

मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका लागला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही. खंडणीतील आरोपीवर मकोका लागला पाहिजे. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुटुंबाला शब्द दिला तो पाळा.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजास संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, शांत राहा. पण तुमच्या कुटुंबाचे, गल्लीचे गावाचे संरक्षण करावे तुम्हाला करावे लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकांना मदत करा नाहीतर मुडदे पडतील, आपल्या लेकी बाळे संपतील. किती दिवस आपण मुक्क्याप्रमाणे बसणार आहात. हे मुठभर आहेत, त्यांचा माज उतरवण्यास वेळ लागणार नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तर यापुढे सावध राहा. मी त्यांना मोजत नाही. कधी मोजणार नाही. मी मृत्यूस घाबरत नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगणार नाही. परंतु तुम्ही बेफीकर राहू नका. या लोकांना नीट करण्याचा सर्व गोष्टी मराठ्यांचा हातात आहे. ही लोक धनंजय देशमुख यांना धमकी देत आहेत आणि आम्ही गुंडांना बोलायचे नाही का? आता जशाच्या तसे उत्तर द्यावे लागणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे तुमच्या घरातील कोणी मेल्यावर आम्ही मोर्चा काढायचे काय? आमच्या संतोष देशमुख यांच्या जीव घेतला, त्यानंतर तुमचे समाधान झाले नाही. प्रतीमोर्च काढण्याचे सांगत आहात. हे लक्ष मस्तीत वागू लागत आहे. त्यांच्या मुजोरपणामुळे त्यांची पत कमी करुन घेतली आहे.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.