AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीत समाजास बंधन मुक्त ठेवले, आता आरक्षणाच्या लढाईत लढून मरणार…मनोज जरांगे यांचे भावनिक वक्तव्य

विधानसभा निवडणुकीबाबत समाजाला संकेत दिले आहे. ते त्यांना कळाले आहेत. त्यामुळे संभ्रम ठेऊ नका. लोकसभेला पाडा म्हणलो होतो, आताही पाडा म्हणलो आहे. हे गोरगरिबांना कळले आहे. आता काही संभ्रम नाही. मराठ्यांनी बिनधास्त चालावे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान एकजुटीने करावे.

विधानसभा निवडणुकीत समाजास बंधन मुक्त ठेवले, आता आरक्षणाच्या लढाईत लढून मरणार...मनोज जरांगे यांचे भावनिक वक्तव्य
| Updated on: Nov 12, 2024 | 2:08 PM
Share

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मंगळवारी मनोज जरांगे नारायणगडाकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी माझा समाज बंधन मुक्त केले आहे. माझ्या ऐकण्यात समाज आहे. यामुळे मी काही माझा समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. समाज विकलाही नाही. मी समाजाचा सन्मान केला आहे. तुम्हाला सांगितले आहे, तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मी आरक्षणाच्या लढाईत लढून लढून मरणार आहे, असे भावनिक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले.

आज कार्तिकी एकादशी आहे. यामुळे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी नारायणगडावर जात आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काय करणार ते सांगितले. ते म्हणाले, आता आम्ही सामूहिक आमरण उपोषणची तयारी करत आहोत. सामूहिक आमरण उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाल्यावर जाहीर करणार आहोत.

या लोकांना धडा शिकवा…

बबनराव लोणीकर यांच्यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे म्हणाले, या लोकांना जातीचा स्वाभिमान नाही. त्यांच्या वागणुकीमुळे मराठा समाज अडचणीत येत आहे. ते आपल्या रक्ताचे असून या पद्धतीची भाषा वापरत असतील तर समाजाने त्यांना दूर ठेवले पाहिजे. या लोकांना 100 % धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाही. या लोकांना रस्त्यावर आणण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे.

आरक्षणाला विरोध करणारा गेलाच पाहिजे

विधानसभा निवडणुकीबाबत समाजाला संकेत दिले आहे. ते त्यांना कळाले आहेत. त्यामुळे संभ्रम ठेऊ नका. लोकसभेला पाडा म्हणलो होतो, आताही पाडा म्हणलो आहे. हे गोरगरिबांना कळले आहे. आता काही संभ्रम नाही. मराठ्यांनी बिनधास्त चालावे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान एकजुटीने करावे. आपल्या आरक्षणाला विरोध करणारा गेलाच पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.