AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

manoj jarange patil | मुंबईत मनोज जरांगे कसे पोहचणार, सोबत किती लोक येणार

manoj jarange patil maratha reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. या मार्गात मनोज जरांगे पाटील दोन दिवस पुण्यामध्ये थांबणार आहेत. पुण्यात एक कोटी मराठा बांधव जमा होणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

manoj jarange patil | मुंबईत मनोज जरांगे कसे पोहचणार, सोबत किती लोक येणार
| Updated on: Jan 15, 2024 | 11:14 AM
Share

जालना, संजय सरोदे, दि.15 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनादरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईत किती लोक येणार? हे ही त्यांनी सांगितले. मुंबईत आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार आहे. सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

असा असणार मार्ग

  • 20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
  • 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
  • 22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
  • 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
  • 24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
  • 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
  • 26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी

पुण्यात एक कोटी मराठा येणार

पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा अकाडा एक करोडो होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे, असे आवाहन केले. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांचा ताब्यात देण्याची त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात गावाच्या वेशीपर्यंत

प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत एक लाख असो की एक कोटी असो, ते पाहिले जाईल. रोज पायी बारावाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्कामी करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला आता वेळ द्यायचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.