AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार?

"मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे", असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अखेर मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2024 | 10:53 PM
Share

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची उत्सुकता आहे. मनोज जरांगे रात्री उमेदवारांची घोषणा करणार अशी चर्चा होती. पण मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबत अद्याप चर्चा सुरु आहे. अजून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. असं असलं तरी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रात्रीत किंवा उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“बीड मतदारसंघ लढवण्याचं ठरवलं आहे. केज, मंठा, परतूर, फुलंब्री हे मतदारसंघ लढवायचं ठरवलं आहे. बाकीचे नावं आले नाहीत तिथे पाडायचं आहे. कन्नड, हिंगोली, वसमत हे लढवायचे ठरवले आहे. पण त्याबाबत चर्चा सुरु आहे. परभणीतील पाथरी, गंगाखेड, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, धाराशिव आणि कळंब लढवण्याचं ठरवलं आहे. दौंड, पर्वती हे सुद्धा लढवण्याचं ठरवलं आहे. पार्थडी, कोपरगाव, पाचोरा, करमाळा, माढा, धुळे शहर, निफाड, नांदगाव या मतदारसंघांवर निवडणूक लढवायची आहे. पण त्याबाबत चर्चा सुरु आहे”, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

“एकूण 25 मतदारसंघांवर चर्चा झाली आहे. उमेदवार जाहीर करायचे राहिले आहेत. आज रात्री किंवा सकाळी उमेदवार जाहीर करु. सकाळी सात वाजेच्या आत आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. कारण उद्या शेवटचा दिवस आहे. ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत तर माझी राज्यभरातील मराठा समाजाला विनंती आहे की, तुमच्या मतदारसंघाचं नाव आलं नसेल तर आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी दहा ते पाच असेनात, पण निवडून आणायचं आहे. गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावं”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

‘या’ मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार

  • 1) केज, बीड जिल्हा
  • 2) परतूर, जालना जिल्हा
  • 3) फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
  • 4) बीड, बीड जिल्हा
  • 5) हिंगोली, हिंगोली जिल्हा
  • 6) पाथरी, परभणी जिल्हा
  • 7) हदगाव, जिल्हा नांदेड
  • 8) कळंब, जिल्हा धाराशिव
  • 9) भूम-परांडा, जिल्हा धाराशिव
  • 10) दौंड, जिल्हा पुणे
  • 11) करमाळा, जिल्हा सोलापूर
  • 12) निलंगा, जिल्हा लातूर
  • 13) पार्वती, जिल्हा पुणे
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.