मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, मुंबईत जाण्यासाठी थेट..
मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मुंबईचा प्लान सांगितला आहे. जरांगे यांनी मोठी घोषणा केली. येत्या एक ते दोन दिवसात नक्की काय करायचे हे सांगताना जरांगे पाटील यांनी सांगितले. मोठी घोषणा त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले. आजापासून मुंबईत दाखल होण्यास सुरूवात करा, असे त्यांनी म्हटले. पुढचे 12 दिवस हळूहळू मुंबईत जा. पोलिसांना कळू देऊ नका. मराठे मुंबईत आलेत हे कोणालाही कळू देऊ नका. सगळे सोबत जाणे शक्य नाही. मी पण हळूहळू मुंबईत येतो. मी आलो की, मग तुम्ही बाहेर पडा. मित्र, नातेवाईकांकडे जा. जर तुम्हाला पोलिसाने पकडून नेले तर घाबरून जाऊ नका. उलट तुमची तिथे जास्त सोय होईल. तुम्हाला कोण नेते ते पण मी बघतो. आझाद मैदानात जाऊ नका. गणपती बघायला, मुंबईतील पाहुण्यांना भेटायला जाऊ शकतात. पण आजपासून मुंबईत जायला सुरूवात करा. सरकारकडून कोणीही संपर्क केला नाही. आमच्या इतके देव देव कोणीही करत नाहीत, ते दीड दिवसाचा गणपती बसवतात. त्यांच्याकोणी जवळचे असतील त्यांना निरोप आला असेल मला तर आला नाही.
मी कालपासून इथून उठलो पण नाही. 24 तास हे सोडून द्या पोरांनो आपले मुंबईचे सुरू करा. आझाद मैदानाकडे जाऊ नका, असेही स्पष्ट शब्दात जरांगे यांनी म्हटले. मी मुंबईत आल्यावर या असेही त्यांनी म्हटले. भाजपामध्ये आलेले लोक जेलमध्ये जाऊ शकत नाहीत, ते संविधानिक आहे. कितीही मोठे खोटाळे केले तरीही. ते दोन संविधान चालवतात.
आपले सोपे करा. आपले हळूहळू 12 तारखेच्या अगोदर मुंबईला जा. मित्राकडे जा. पोलिसांनी धरले तर नीट पोलिस स्टेशनला जा. जे जात आहेत, पुढे त्यांनी झेंडा बांधून जा नका. ते ओळखतात, हळूहळू जा.. माझ्यासोबत थांबू नका. आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बघायचे आहे.
आपल्याला पोलिसांकडे नाही बघायचे, पोलिसांना त्रास देऊ नका. उपोषण मी सोडणार नाही, मी मुंबईतच जाणार. अजिबात आझाद मैदानात आणि वर्षा बंगल्यावर जायचे नाही, त्यांना संशय येणार नाही. नातेवाईकांकडे जा, तिथे जाऊन गप राहा. खूप लोक आपले तिकडे आहेत. एक ते दोन लाख घर आपली तिकडे आहेत. पोलिस काय लय नाहीत, उगाच इथे
