AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांनी आता जातीय समीकरण केलं फिट, M फॅक्टर काय?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठी, मुस्लीम आणि दलित समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे. की ७५ वर्षानंतर ही संधी आली आहे. त्यामुळे ही संधी वाया जाऊ देऊ नका.

मनोज जरांगे पाटील यांनी आता जातीय समीकरण केलं फिट, M फॅक्टर काय?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 31, 2024 | 10:01 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी आता जातीय समीकरण फिट केलंय. मराठा, मुस्लीम आणि दलित या समीकरणातून आता सत्ताधाऱ्यांना पाडून जिंकणार, असं जरांगेंनी म्हटलंय. अंतरवाली सराटीत मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत जरांगेंची बैठक झाली आणि या बैठकीत मराठा, मुस्लीम आणि दलित असं समीकरण सेट करण्यात आलं. एक एका मतदारसंघात 4-5 अर्ज भरण्याचं आवाहन आधीच जरांगेंनी केलं होतं. आता कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचे अर्ज काढायचे हे मराठा, मुस्लीम आणि दलित समीकरणावरुन ठरवलं जाणार असून 3 तारखेला घोषणा होणार आहे.

जरांगेंचा अधिक जोर हा मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यात 48 विधानसभेच्या जागा आहेत. स्वाभाविक आहे, जरांगेंच्या निशाण्यावर भाजपचेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात असतील. तसा डाव राखून ठेवल्याचंही जरांगे सांगत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा असला तरी, एकट्या मराठ्यांच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना पराभूत करता येत नाही, हे जरांगेंना चांगलं माहिती होतं. आणि जरांगे फक्त मराठाच नाही तर मुस्लीम आरक्षणाचीही मागणी करत आहेत. त्यातूनच मराठा, मुस्लीम आणि दलित कॉम्बिनेशन जरांगेंनी तयार केलंय. अर्थात या M आणि D फॅक्टरचा परिणाम 23 नोव्हेंबरला दिसेल.

दलित, मुस्लीम आणि मराठा एकत्र आलाय, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आल्याणे आता कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही. तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचे आणि माघारी यायचं. ७५ वर्षानंतर ही संधी मिळालीये ती वाया जाऊन द्यायची नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका जातीवर कोणीही जिंकत नाही, मराठा असो वा कुणीही. राजकारण सोपे नाही. राजकीय प्रवासासाठी  सगळ्या जातीधर्मांशिवाय पर्याय नाही. फूट पाडायचा प्रयत्न होता, शेवटच्या टप्प्यात आम्ही एकत्र आलो. आरक्षण देत नाही. मराठा नको, केवळ मराठा मतदानापुरता हवाय. कारखाने, शाळा सगळे या लोकांचे आहेत. नेता नको, पक्ष नको, आम्ही कुणाला मोठे करणार नाही. असं ही जरांगे म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!