AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : ‘त्यामुळे यांचं आता सगळं मुळा…’ मनोज जरांगे पाटील काय बोलले?

Manoj Jarange Patil : "एका लेकीन हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा देऊन उद्या संभाजीनगरमध्ये उपस्थित रहा" असं मनोज जरांगे पाटील बोलले.

Manoj Jarange Patil : 'त्यामुळे यांचं आता सगळं मुळा...' मनोज जरांगे पाटील काय बोलले?
manoj jarange patil
| Updated on: Jan 18, 2025 | 1:57 PM
Share

“समाजाचा मोर्चा असल्यामुळे मी समाज म्हणून उद्या छत्रपती संभाजी नगर मध्ये निघणाऱ्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. बांधवांना ही माझी विनंती आहे की, सर्वांनी उद्या त्या मोर्चाला उपस्थित रहा. कारण एका लेकीन हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा देऊन उद्या संभाजीनगरमध्ये उपस्थित रहा” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “सध्या जो तपास सुरू आहे. पोलीस, सीआयडी आणि एसआयटी असतील त्यामधली सगळी साखळी शोधणं खूप गरजेचं आहे. हे खूप मोठे रॅकेट आहे लहान रॅकेट नाही. खूप मोठ्या गुंडाच्या टोळीचं साम्राज्य उभं केलेलं आहे. त्यामुळे याच्या खोलामध्ये जाणं खूप गरजेचे आहे. कारण हे खूप मोठे कुख्यात गुंड आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“कारण आतापर्यंत समोर येत नव्हतं किंवा लोक आणत नव्हती. कारण यांची खूप दहशत होती. परंतु आता लोकांच्या मनावर सुद्धा दडपण आणि दहशत गेल्यामुळे हे बाहेर यायला लागलं. त्यामुळे यांचं आता सगळं मुळा गाळा पर्यंत उकरून काढणं गरजेचं आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मागील वीस-पंचवीस वर्षापासून लोक खूप अन्याय सहन करत आहेत. त्यामुळे लोकांनी आता व्यक्त व्हायला पाहिजे. पुढे येऊन आपल्यावर झालेला अन्याय सांगायला पाहिजे. बीडच्या एसपींना सांगा, कलेक्टरांना सांगा” असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

‘खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच’

“त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की, यामधला एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठं षडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे आणि ही सगळी संपली पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “नाहीतर नंतर लोक या विरोधात उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये येणार आहेत. “कारण ज्यांनी खून केला आणि ज्यांनी खंडणी मागितली. मागायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्याला मधी घेणं गरजेचं आहे. ज्यांनी खंडणी वसूल करण्यासाठी लोक पाठवले आणि खून करण्यासाठी लोकं पाठवले. खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा हा जो काही सामूहिक गट घडून आणला हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे खंडणी मधला सुद्धा एकही आरोपी सुटता कामा नये” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.