AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा जीआर महागात पडणार, उद्या बंजारा, धनगर पुढे आले तर काय करणार ? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सवाल

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट संदर्भातला शासन निर्णय जो काढला आहे तो सरकारलाच महागात पडणार आहे. हा निर्णय फक्त ओबीसीचं नाही तर सर्वच मागासवर्गीयांचं आरक्षण संपवणारा आणि आरक्षणाचा बट्ट्याबोळ उडवणारा निर्णय असल्याची टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

हा जीआर महागात पडणार, उद्या बंजारा, धनगर पुढे आले तर काय करणार ? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सवाल
Prakash Shendge
| Updated on: Sep 05, 2025 | 12:26 AM
Share

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबतचा जीआर सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला घाबरुन दिला असला तर हा निर्णय सरकारला पुढे चांगलाच महागात पडणार आहे. केवळ ओबीसीचं नाही तर सर्वच मागासवर्गीयांचा आरक्षण संपवणारा हा निर्णय आरक्षणाचा बट्ट्याबोळ उडवणारा असल्याची जोरदार टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

महाराष्ट्र बंद केला, जाळपोळ केली,बस जाळली म्हणून आरक्षण द्या असं होत नाही. मनोज जरांगे यांच्या धमक्यांना आता सरकारने किती भीक घालायची हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं फक्त आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये एवढीच आमची भूमिका असल्याचेही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

गॅझेटिअरमध्ये प्रत्येक समाजाचीच नोंद असल्यामुळे पुढच्या काळामध्ये बंजारा समाज, धनगर समाज याबरोबरच इतर सर्व समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करेल आणि त्यानंतर सरकारला ते द्यावेच लागेल असा सावधनतेचा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे. सग्या सोयऱ्या संदर्भातला शासन निर्णय बदलता येत नाही म्हणून तीच भाषा सरकारने या शासन निर्णयात मांडल्याचेही विधान प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केले आहे. मराठ्यांसाठी शासन निर्णय घेत असेल तर धनगरांसाठी का निघू नये बंजारा समाजासाठी का निघू नये? असा सवाल देखील प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

तायवाडे यांनी आंदोलन मागे का घेतले?

कोणत्या १२ मागण्या मान्य केल्या, त्याचा शासन निर्णय निघाला का ? शासन निर्णय न घेताच बबन तायवाडे यांनी उपोषण कसं सोडलं? असा प्रश्न प्रकाश शेंडगे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर येथील बबन तायवडे यांच्या उपोषणावर बोलताना केला आहे. गेल्यावेळी अशाच मागण्या मान्य झाल्या होत्या, मात्र त्याचे किती शासन निर्णय निघाले.? एकही नाही निघाले ना…? जरांगे यांच्याप्रमाणेच तायवाडे यांनी सुद्धा शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत मंत्र्यांना फिरू देणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं. बबन तायवाडे यांनी काय भूमिका घेतली , छगन भुजबळ यांनी काय भूमिका घेतली याला महत्त्व नाही समाजाने काय भूमिका घेतली याला महत्त्व आहे असेही पुढे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन.
शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरला
शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरला.
15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार
15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार.
आता परदेशात शिक्षण घेणं स्वस्त होणार! सीतारमण यांनी केली घोषणा
आता परदेशात शिक्षण घेणं स्वस्त होणार! सीतारमण यांनी केली घोषणा.
टॅक्समध्ये गडबड केल्यास दंड! सीतारमण यांनी थेट इशाराच दिला
टॅक्समध्ये गडबड केल्यास दंड! सीतारमण यांनी थेट इशाराच दिला.
आयुर्वेद क्षेत्रात 3 नवीन ऑल इंडिया आयुर्वेद इन्स्टिट्यूट स्थापन होणार
आयुर्वेद क्षेत्रात 3 नवीन ऑल इंडिया आयुर्वेद इन्स्टिट्यूट स्थापन होणार.
लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार महिलांसाठी 'SHE-MART' तयार करणार
लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार महिलांसाठी 'SHE-MART' तयार करणार.