AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील नव्या घोषणेच्या तयारीत, 16 मे रोजी नव्या आंदोलनाची तारीख करणार जाहीर

Manoj Jarange Patil : "कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकार देतं. सरकारलाच काम होऊ द्यायचं नाहीय. सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा आहे.हे डावपेच आपण ओळखले पाहिजेत"

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील नव्या घोषणेच्या तयारीत, 16 मे रोजी नव्या आंदोलनाची तारीख करणार जाहीर
Manoj Jarange Patil
| Updated on: May 08, 2026 | 2:16 PM
Share

“कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे. याला एकजूट हाच पर्याय आहे, तुम्ही या सरकारला किती मायेने आणि पोटतिडकीने सांगितलं ते कधीही आपल्या डोळ्यातले अश्रू पुसणार नाहीत. तुम्हाला आंदोलनाच्या पावित्र्यात यावं लागेल, कट्टरतेने यावं लागेल, सरकारची किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याची दया-माया करून चालणार नाही, तरच न्याय पदरात मिळू शकतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाही? मराठा समाजातील तरुणांच्या तक्रारी वाढत आहेत.आपण 16 मे ला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“या राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन आपण उभं करत आहोत, त्याची तारीख मी 16 मे ला सांगणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावर उठला आहे असे बोलले जाते. मला आतलं माहित नाही, पण याला सर्वस्वी जबाबदार सरकार असतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांच्या पोरांचं सिविल खराब होत आहे

“कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकार देतं. सरकारलाच काम होऊ द्यायचं नाहीय. सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा आहे.हे डावपेच आपण ओळखले पाहिजेत” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पण यामध्ये वाटोळ मराठा समाजाचं होत आहे.मराठ्यांच्या पोरांचं सिविल खराब होत आहे. कर्जबाजारी होत आहे, याला मूळ कारण सरकार आहे” असं ते म्हणाले.

राज्यात खूप मोठं आंदोलन उभं राहणार

“सारथी पासून ते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही.कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी सरकार जाणून-बुजून देत नाही. या सगळ्या विषयावरती राज्यात खूप मोठं आंदोलन उभं राहणार आहे. त्याची तारीख आम्ही 16 मे ला जाहीर करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....