AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती’, मनोज जरांगे पाटलांचे आंदोलकांना आवाहन

मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी आंदोलन नियम मोडत असल्याचे म्हटलं. आता मनोज जरांगे पांटलांनी आंदोलकांना नियम न मोडण्याची विनंती केली आहे.

'तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती', मनोज जरांगे पाटलांचे आंदोलकांना आवाहन
jarange and protesters
| Updated on: Sep 01, 2025 | 7:32 PM
Share

मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. आज या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी आंदोलन नियम मोडत असल्याचे म्हटलं. त्यामुळे कोर्टाने आंदोलकांना नियम पाळण्याची सूचना केली आहे. यानंतर आता मनोज जरांगे पांटलांनी आंदोलकांना नियम न मोडण्याची विनंती केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे – जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे. आपल्याला शेजारी एक मैदान मोकळं करुन दिलं आहे. तिथे गाड्या लावा आणि मैदानावर झोपा. तुम्हाला आरक्षण पाहिजे नसेल तर तुम्ही गावाकडे जाऊ शकता. मला किती त्रास होत आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुमच्या लेकराबाळांसाठी मी कष्ट सहन करत आहे. आरक्षण देऊन लेकरांच्या पिढ्यांचा उद्धार करायचा आहे. मला माझी जात मोठी करायची आहे.

तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहे

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला त्रास होत आहे. मला तुमच्यासोबत बोलण्यासाठी पाणी प्यावे लागत आहे. माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे, मुंबईकरांना त्रास देऊ नका. तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. सर्वांनी मैदानात गाड्या लावा आणि झोपा, गावाकडून लोक जेवण पाठवत आहेत, त्यांना आपली काळजी आहे. आपल्याला न्यायालयाच्या नियमाचे पालन करायचे आहे. तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहे, ज्याला ऐकायचं नाही त्यांनी गावाकडे जा असंही जरांगे पाटलांनी म्हटले आहे.

ओबीसी समाजाकडून आंदोलनाची घोषणा

आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. छगन भुजबळांनी म्हटलं की, ‘ते लोक काय करणार याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरु करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत सगळीकडे मोर्चे काढा. त्यांना आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत ही मागणी करा असा आदेश भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.