AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Menstrual Cycle : मासिक पाळी आहे म्हणून मुलीला झाड लावू दिले नाही त्याच नाशिकमध्ये रंगला मासिक पाळी महोत्सव

मासिक पाळी.... महिलांनाच मिळालेलं एक वरदान... आजही समाजात मासिक धर्माबाबत बोललं जात नाही... इतकंच काय तर नागरिकांच्या मनात पूर्वग्रह आणि चुकीच्या समजुती आहेत.  खरंतर हा शारीरधर्म विज्ञानाधारित आहे. त्याच दृष्टीकोनातून त्याकडे बघायला हवे. मात्र आजही अंधश्रद्धांमुळे समाज काही प्रमाणात बुरसटलेलाच दिसतोय आणि याच विषयाची जनजागृती व्हावी यासाठी नाशिकमध्ये एका पित्याने पुढाकार घेतलाय.

Menstrual Cycle : मासिक पाळी आहे म्हणून मुलीला झाड लावू दिले नाही त्याच नाशिकमध्ये रंगला मासिक पाळी महोत्सव
| Updated on: Aug 05, 2022 | 3:41 PM
Share

नाशिक : मासिक पाळी(Menstrual cycle) आहे म्हणून एका मुलीला झाड लावू न दिल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली होती. या घटनेवरुन चांगलात वादंग उडाला होता. त्याच नाशिकमध्ये मासिक पाळी महोत्सव(menstruation festival ) रंगला होता. विशेष म्हणजे एका पित्यानेच हा महोत्सव आयोजीत केला होता. या महोत्सवाची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शवली होती.

मासिक पाळी…. महिलांनाच मिळालेलं एक वरदान… आजही समाजात मासिक धर्माबाबत बोललं जात नाही… इतकंच काय तर नागरिकांच्या मनात पूर्वग्रह आणि चुकीच्या समजुती आहेत.  खरंतर हा शारीरधर्म विज्ञानाधारित आहे. त्याच दृष्टीकोनातून त्याकडे बघायला हवे. मात्र आजही अंधश्रद्धांमुळे समाज काही प्रमाणात बुरसटलेलाच दिसतोय आणि याच विषयाची जनजागृती व्हावी यासाठी नाशिकमध्ये एका पित्याने पुढाकार घेतलाय.

कृष्णा चांदगुडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलीला आलेल्या पाळीचा महोत्सव साजरा करण्याचे ठरविल होतं. आणि नाशिककरांच्या उपस्थित जनजागृती करत हा मासिक पाळी महोत्सव पार पडलाय.

नुकत्याच नाशिकच्या एका आदिवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीला मासिक पाळीत झाडं लावू दिलं नाही म्हणून राज्यभरात चर्चिला गेलेला विषय पाहून मासिक पाळीची जनजागृती व्हावी आणि याची सुरुवात घरातूनच व्हावी यासाठी चांदगुडे यांनी हा पुढाकार घेतलाय.

आता माझी पाळी… मीच देते टाळी असं म्हणत पार पडलेला मासिक पाळी महोत्सव मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत असं सहभागी झालेल्या महिलानी म्हटलंय. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीची तारुण्यावस्थेत पदार्पण होणे याची प्रक्रिया सामाजात जनजगृती होण्याची गरजही व्यक्त केली जातेय.

खरं म्हणजे मासिक पाळीच्या बाबतीत आजही समाजातील विचार हा बुरसटलेलेच आहेत. वेगवेगळे संदर्भ देऊन आजही मासिक पाळीच्या बाबतीत गैरसमज आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पार पडलेला हा महोत्सव जगभर आणि व्यापक स्वरूपात व्हायला हवा हीच काय ती अपेक्षा.

मासिक पाळी म्हणजे नक्की काय?

मासिक पाळी म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. मासिक पाळीची सुरुवात सर्वसाधारणपणे 12-13 व्या वर्षी होते. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीपर्यंत किंवा मोनोपॉजपर्यंत म्हणजेच 45-50 या वयापर्यंत हे चक्र सुरु असते.

मासिक पाळी आणि संसर्ग

खेडगावात किंवा ग्रामीण भागात महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड, प्लास्टिक, भुसा किंवा चक्क राखेचा वापर करतात. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो असे अनेकदा सांगितले जाते. मात्र तरीही देशातील केवळ 30 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात.

मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या खराब कपड्यांमुळे महिलांना योनीमार्गाचे संक्रमण, मूत्राशयाचा किंवा गर्भाशयाचा संसर्ग होतो. विशेष म्हणजे यामुळे महिलांच्या गर्भधारणेत अनेक अडचणी येतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.