AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते…मंत्री गुलाबराव पाटील संतापले, एकनाथ खडसेंनी दिले उत्तर

दहा वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती. मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केले. जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.

अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते...मंत्री गुलाबराव पाटील संतापले, एकनाथ खडसेंनी दिले उत्तर
gulabrao patil
| Updated on: Sep 07, 2024 | 6:12 PM
Share

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या भाषणांनी अनेक सभा जिंकलेल्या असतात. विधिमंडळाच्या सभागृहात विरोधकांचा आघाडीवर येऊन सामना ते करत असतात. परंतु राज्य सरकारमधील सर्वात महत्वाचे खाते असलेल्या अर्थ खात्याविषयी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी अर्थखात्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे. दहा वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती. मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केले. जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.

जळगावात हातपंप दुरुस्ती, वीज पंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्या वेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाणी पुरवठा खात्याच्या एका फाईलचा अनुभव सांगितला. ती फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली. त्यानंतर ती परत आली. पण मी सुद्धा पाठपुरावा सोडला नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी दिले उत्तरत

अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे, या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांना कदाचित अर्थ खात्याचा वाईट अनुभव आला असेल. परंतु मी ही अर्थमंत्री होतो. अर्थ खात्याविषयी अनेकांची अशीच धारणे असते. अर्थ खाते योजनांमध्ये अडथळे आणते, असा आरोप होत असतो. परंतु अर्थ खात्याने अडथळे आणले नसते तर राज्याची तिजोरी एक दिवसात खाली झाली असती.

प्रत्येक ठिकाणी अर्थ खाते हे चाळणी करण्याचे काम करत असते. ते आवश्यकच आहे. अर्थखात्याकडून चाळणी झाल्यावर जिथे आवश्यकता असते तिथेच पैसे दिले जातात. त्यामुळे या खात्याला नालायक खाते म्हणता येणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Follow Us
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.