AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुसंस्कृत डोंबिवलीला कलंक, आमदाराच्या भावाने घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची रात्रीची सुरक्षा धोक्यात आली आहे. मद्यधुंद तरुणांच्या गुंडगिरीमुळे येथील कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती समोर आली आहे. सत्ताधारी आमदाराच्या नातेवाईकाला आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप रात्री बंद ठेवावा लागला.

सुसंस्कृत डोंबिवलीला कलंक, आमदाराच्या भावाने घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
dombivali 1
| Updated on: Sep 28, 2025 | 8:15 AM
Share

एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची प्रतिमा सध्या मलिन होत चालली आहे. डोंबिलवीत रात्रीच्या वेळी मद्यधुंद तरुण आणि गुंडगिरीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या शहरातील अराजकतेची ही समस्या इतकी वाढली आहे की, चक्क सत्ताधारी आमदाराच्या चुलत भावाला आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप रात्रभर बंद ठेवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर-गणेश नगर परिसरात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे चुलत बंधू सुरेश मोरे यांचा पेट्रोल पंप आहे. मागील काही महिन्यांपासून रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत येथे मद्यधुंद तरुणांकडून कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ करणे, विनाकारण त्रास देणे आणि मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहे. या त्रासाला कंटाळून आणि कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे पंपचालक सुरेश मोरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

बॅनरवर लिहिलंय काय?

सुरेश मोरे यांनी आपल्या पंपाबाहेर एक मोठा बॅनर लावून आपली व्यथा मांडली आहे. पेट्रोल पंपाची वेळ ही सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत असेल. रात्रीच्या वेळेस दारू पिऊन काम करणाऱ्या मुलांना शिवीगाळ करणे, धमकी देणे या त्रासाला कंटाळून रात्री पंप बंद राहील, असे त्यांनी या बॅनरवर नमूद केले आहे. हा निर्णय अत्यंत गंभीर असल्याचे जनतेचे म्हणणं आहे. कारण सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्याच कुटुंबातील सदस्याला जर रात्रीच्या वेळेस पंप चालवण्यासाठी पोलीस संरक्षण मिळत नसेल किंवा स्थानिक गुंडगिरीचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, हे स्पष्ट होते.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

डोंबिवली शहर अनेक दशके मराठी साहित्य, कला आणि विचारवंतांचे केंद्र राहिले आहे. मात्र, सध्या रात्रीच्या वेळी वाढलेल्या या अराजकतेमुळे शहराच्या या सुसंस्कृत प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या रात्रीच्या गस्त आणि बंदोबस्तावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे शहरातील नागरिक रात्रीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.