AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण्यांना खडेबोल सुनवा… साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे यांनी टोचले कान

मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी गरज लागेल त्यावेळी आम्ही आहोतच. अन्यथा आम्हाला ऐकायला बोलवावं. बोलायला बोलू नये, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.

राजकारण्यांना खडेबोल सुनवा... साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे यांनी टोचले कान
| Updated on: Oct 07, 2024 | 1:37 PM
Share

Raj Thackeray Pune Speech : “मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. नुकतंच पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंनी दमदार भाषण केले.

“साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं”, राज ठाकरेंचा मिश्किल सवाल

“माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं. आम्ही त्यांची भाषण वाचून पुढे जातो, तेव्हा त्यांच्यासमोर बोलायचं नसतं. फक्त ऐकायचं असतं. मला वाटतं की हे फोटोच काय ते सांगत आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे, इतर राज्यांपेक्षा काय आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.

“साहित्यिकांच्या कार्यक्रमाला बोलायला बोलू नये”

“साहित्यिकांच्या कार्यक्रमाला मला बोलावलं. अशा ठिकाणी आमची काय गरज असते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी गरज लागेल त्यावेळी आम्ही आहोतच. अन्यथा आम्हाला ऐकायला बोलवावं. बोलायला बोलू नये. राज्यातील साहित्यिक, कवी पाहत आलो, तो मराठी बाणा म्हणतो तो प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा, योग्यवेळी जे ठणकावून सांगणे, राजकारण्यांना, बिघडलेल्या सांस्कृतिक आणि इतर गोष्टींना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत होती, ती आज कमी दिसतेय असं वाटतं”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

“जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य”

“महाराष्ट्राचा झालेला खेळ, राज्याची सर्कस झाली आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राज्यात कित्येक लोक राजकारणात आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे. राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकतो. आम्ही बोललो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही”, असेही राज ठाकरे म्हणाले.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...