AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक APMC कडून खास मोबाईल App

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनं एका अनोख्या मोबाईल Appची निर्मिती केली आहे. या Appमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. या मोबाईल App चं नाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असं आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक APMC कडून खास मोबाईल App
नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री
| Updated on: Feb 08, 2021 | 4:03 PM
Share

नाशिक : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वारंवार होणारी फसवणूक बघता कृषी उत्पन्न बाजार समितीनं एका अनोख्या मोबाईल Appची निर्मिती केली आहे. या Appमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. या मोबाईल App चं नाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असं आहे. महत्वाची बाब म्हणजे या मोबाईल Appच्या माध्यमातून शेतमालाचे रोजचे भाव शेतकऱ्यांना समजणार आहेत.(Mobile app from Nashik APMC to prevent fraud of farmers)

मोबाईल Appवर बाजारभाव कळणार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीत नाशिक जिल्ह्यासह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातूनही शेतकरी आपला शेतमाल, पालेभाज्या, फळं विक्रीसाठी घेऊन येतात. शेतकऱ्यांची सुरक्षितता वाढावी आणि बाजारसमितीबाहेर होणारी त्यांची फसवणूक टाळता यावी यासाठी बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या संकल्पनेतून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती Appची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल App द्वारे शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात पालेभाज्या, फळं, कांदा, लसूण, बटाट्याला मिळालेला बाजारभाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना आपल्या मालाला मिळालेला भाव माहिती होईल.

शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी Appची निर्मिती

सध्या नियमनमुक्तीमुळं व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करत आहेत. लिलाव प्रक्रियेदरम्यान व्यापारी, आडते, हमाल आणि अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या मोबाईल App च्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीकडून या मोबाईल App ची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे App आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपली नोंद करण्याचं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलं आहे.

दर अमावस्येला लासलगाव बाजार समिती बंद

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत कांद्याच्या बाबतीत बाजार समितीने नावलौकिक कमवले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी उपबाजार आवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र, आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही विपदा येऊ नये म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात होती.

आज एकविसाव्या शतकात शेती पीके वाहतुकीसाठी आधुनिक वाहनांची उपलब्धता झाली आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले असून मंगळ ग्रहासह अनेक ग्रहांवर वेगवेगळे प्रयोग करत जीवसृष्टीचा शोध घेतला जात असताना दर अमावस्येला लासलगाव बाजार समितीत कांदा व धान्य लिलावात घटक कामकाजात सहभागी होत नसल्याने बंद ठेवण्याची परंपरा आजही अवलंबिली जाते ही विशेष आहे.

संबंधित बातम्या :

शहाद्याच्या नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन, 11 हजार सीड बॉल आणि 1 हजार रोपांचं वाटप!

एका शिक्षकानं नाशकातलं गाव गुलाबी केलं, राज्यपालांनाही पहाण्याचा मोह आवरला नाही, पाहा स्पेशल रिपोर्ट

Mobile app from Nashik APMC to prevent fraud of farmers

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.