Monsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

उद्या मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेलाय.

Monsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी भरले असून रेल्वे रुळावरही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 10:46 PM

मुंबई : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट दिला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेलाय. हवामान खात्याने मुंबईतही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिवृषीचे ढग दक्षिणेकडे वळल्यामुळे मुंबईचा रेड अलर्ट आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आल्याची माहितीही हवामान विभागाने दिलीय. (Rain forecast in Maharashtra, red alert in Raigad, Ratnagiri and warning of heavy rains in Mumbai)

कोकण आणि गोव्यात काय स्थिती?

13 जून म्हणजे रविवारी कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाच पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात काय स्थिती राहणार?

मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं नोंदवलाय.

मराठवाड्यात काय स्थिती राहणार?

मराठवाड्यात 13 जून म्हणजे रविवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवलीय.

विदर्भात काय स्थिती राहणार?

विदर्भातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

होसाळीकरांचा शनिवारी सकाळचा अंदाज

येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस (Rain) पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Video : कृषीमंत्री दादा भुसेंनी धरली चाड्यावर मूठ, तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनीही केली पेरणी!

Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Rain forecast in Maharashtra, red alert in Raigad, Ratnagiri and warning of heavy rains in Mumbai

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.