AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत दोन दिवस उष्णतेचे, पारा चढणार; मुंबईकरांनो घराबाहेर पडताना…

दिवाळीच्या उत्सवाच्या काळात मुंबईत पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेचा अंदाज आहे. हवामान खात्याने 35-36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. फटाक्यांच्या वापरामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे हवेच्या गुणवतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्येही हवेची गुणवत्ता ढासळली असून, "वाईट" श्रेणीत वर्गीकृत झाली आहे. मुंबईकरांनी उष्णतेची काळजी घेणे आणि इको-फ्रेंडली फटाके वापरणे आवश्यक आहे.

मुंबईत दोन दिवस उष्णतेचे, पारा चढणार; मुंबईकरांनो घराबाहेर पडताना...
मुंबईत दोन दिवस उष्णतेचेImage Credit source: social media
| Updated on: Nov 01, 2024 | 11:20 AM
Share

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यासह मुंबईचा आखाडा चांगलाच तापला आहे. ऐन दिवाळीत राजकारण्यांनी राजकीय फटाके फोडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे असणार आहेत. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पुढील दोन दिवस स्वत:ची काळजी घ्यायची आहे. पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके अशी परिस्थिती दोन दिवस असणार आहे. आधीच उन्हाच्या झळांनी मुंबईकरांची लाही लाही झाली आहे. त्यात आता उष्णता वाढणार असल्याने मुंबईकरांचा ताप वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दोन दिवस कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहरातील कमाल आणि किमान तापमानात सतत बदल होत असल्याने पहाटे गारवा जाणवतोय तर दुपारी उन्हाचा चटका सोसावा लागत आहे. वातावरणात शुष्क, गरम झळांचे प्रमाण वाढतच आहे. तसेच ही उष्णता दीर्घकाळ राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबईकर घामाघूम

मुंबईत बदलत्या हवामानामुळे आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढल्याने मुंबईकर घामाघूम होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत हवामानात विविध बदल अपेक्षित आहेत. मुंबईत दृष्यमानता कमी झाली आहे. वातावरण धूरकट झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यातच आता दिवाळी असल्याने फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इको फ्रेंडली फटाके वाजवण्याचं आवाहन केलं जात आहे.

नागपूरची ‘हवा’ काय म्हणतेय?

मुंबईपाठोपाठ नागपुरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. केंद्रीय प्रदूषण नियमंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर बुधवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 147 इतका नोंदवला गेला. शहरातील अंबाझरी परिसरातील हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या वर्गात नोंदवण्यात आलीय. दिवाळीत सर्वाधिक फटाके फोडले जातात. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच फटाके फोडले जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून शहरात काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढला असून हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या श्रेणीत गेली आहे. शहरातील महाल, सिव्हिल लाईन्स आणि रामनगर येथील हवा अत्यंत प्रदूषित झाल्याचं दिसत आहे. गुणवत्ता निरीक्षण केंद्रावर या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा कमी असल्याचं आढळून आलं आहे. अंबाझरी येथील केंद्रात मात्र हाच हवा गुणवत्ता निर्देशांक 209 इतका नोंदवण्यात आलाय. सिव्हिल लाईन्स येथे हा निर्देशांक 103, सर्वच हवा गुणवत्ता निर्देशांक केंद्रावर सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.