AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कबुतरांना दाणापाणी नाहीच! बंदी कायम; कोर्टाचा मोठा निर्णय!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतराखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंत जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता.

मोठी बातमी! कबुतरांना दाणापाणी नाहीच! बंदी कायम; कोर्टाचा मोठा निर्णय!
mumbai court on pigeon food
| Updated on: Aug 07, 2025 | 4:22 PM
Share

Mumbai Kabutar Khana : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतराखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंत जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले होते. दरम्यान, आता न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा आपला आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निकाल देताना न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे?

मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबूतरखान्यांवर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. सोबतच हा निर्णय देतावा आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिलाय. तसेच आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्गाने हरकत घ्या, असे न्यायालयाने सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध

दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावर बंदी कायम ठेवल्याने कबुतरखाने सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी आता सुप्रीम कोर्टाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमका आरोप काय होता?

मुंबईतील कबुतराखाने सध्या बंद करण्यात आले आहेत. पालिकेच्या या कारवाईविरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. हे कबुतरखाने चालू करावेत या मागणीसाठी 4 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतल्या जागा आणि चौक हडपण्यासाठी हा कट रचला जातोय, असा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यानंतर कबुतरखाने चालू करण्याची मागणी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता. मात्र न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.