AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कबुतरांना दाणापाणी नाहीच! बंदी कायम; कोर्टाचा मोठा निर्णय!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतराखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंत जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता.

मोठी बातमी! कबुतरांना दाणापाणी नाहीच! बंदी कायम; कोर्टाचा मोठा निर्णय!
mumbai court on pigeon food
| Updated on: Aug 07, 2025 | 4:22 PM
Share

Mumbai Kabutar Khana : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतराखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंत जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले होते. दरम्यान, आता न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा आपला आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निकाल देताना न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे?

मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबूतरखान्यांवर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. सोबतच हा निर्णय देतावा आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिलाय. तसेच आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्गाने हरकत घ्या, असे न्यायालयाने सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध

दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावर बंदी कायम ठेवल्याने कबुतरखाने सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी आता सुप्रीम कोर्टाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमका आरोप काय होता?

मुंबईतील कबुतराखाने सध्या बंद करण्यात आले आहेत. पालिकेच्या या कारवाईविरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. हे कबुतरखाने चालू करावेत या मागणीसाठी 4 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतल्या जागा आणि चौक हडपण्यासाठी हा कट रचला जातोय, असा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यानंतर कबुतरखाने चालू करण्याची मागणी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता. मात्र न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक