AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेसाठी कालचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे… या दोन घटना चटका लावणाऱ्या

Mumbai Muncipal corporation election: मुंबईसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कालचा दिवस फार महत्त्वाचा होता. पण कालचा दिवस शिवसेनेसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला आहे... दोन घटनांमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेसाठी कालचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे... या दोन घटना चटका लावणाऱ्या
| Updated on: Jan 17, 2026 | 1:49 PM
Share

Mumbai Muncipal corporation election: 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहिर झाले. घोषित झालेल्या निकालानुसार, राज्याप्रमाणेच मुंबईत देखील भाजप पक्ष मोठा ठरला आहे. जवळपास 25 वर्ष मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व होतं.. पण समोर आलेल्या निकालानंतर उद्धव ठाकले आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे… अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महानगरपालिका गेली आहे. या निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. या राजकीय धक्क्यानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली..

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचं निधन झालं आहे… शुक्रवारी रात्री नीला यांचं निधन झालं आहे… शुक्रवारी रात्री 10 वाजता नीला यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नीला यांचं निधन झाले… उपचार मिळण्यापूर्वीच त्याचं निधन झालं… असं देखील सांगण्यात येत आहे.

नीला देसाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. जेव्हा महिलांची संख्या राजकारणात अत्यंत मर्यादित असताना, त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख भक्कम केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासामुळे नीला यांना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. नीला देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या… शिवय विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

निकालानंतर ठाकरे गटात निराशेचं वातावरण

2026 च्या महानगरपालिका निकालानंतर मुंबईवर असलेलं ठाकरे कुटुंबियांचं वर्चस्व नष्ट झालं आहे. आता मुंबईवर भाजपचा झेंडा फडकला आहे… महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्र लढली आणि मोठा वियज प्राप्त केला. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेचे विजयी उमेदवार

शिवसेनेने (यूबीटी) 65 जागा जिंकल्या, मनसेने 6 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने (शरद पवार) 1 जागा जिंकली, काँग्रेसने 24 जागा जिंकल्या आणि एआयएमआयएमने 8 जागा जिंकल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 3 जागा, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत