AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेसाठी कालचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे… या दोन घटना चटका लावणाऱ्या

Mumbai Muncipal corporation election: मुंबईसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कालचा दिवस फार महत्त्वाचा होता. पण कालचा दिवस शिवसेनेसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला आहे... दोन घटनांमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेसाठी कालचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे... या दोन घटना चटका लावणाऱ्या
| Updated on: Jan 17, 2026 | 1:49 PM
Share

Mumbai Muncipal corporation election: 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहिर झाले. घोषित झालेल्या निकालानुसार, राज्याप्रमाणेच मुंबईत देखील भाजप पक्ष मोठा ठरला आहे. जवळपास 25 वर्ष मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व होतं.. पण समोर आलेल्या निकालानंतर उद्धव ठाकले आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे… अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महानगरपालिका गेली आहे. या निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. या राजकीय धक्क्यानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली..

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचं निधन झालं आहे… शुक्रवारी रात्री नीला यांचं निधन झालं आहे… शुक्रवारी रात्री 10 वाजता नीला यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नीला यांचं निधन झाले… उपचार मिळण्यापूर्वीच त्याचं निधन झालं… असं देखील सांगण्यात येत आहे.

नीला देसाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. जेव्हा महिलांची संख्या राजकारणात अत्यंत मर्यादित असताना, त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख भक्कम केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासामुळे नीला यांना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. नीला देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या… शिवय विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

निकालानंतर ठाकरे गटात निराशेचं वातावरण

2026 च्या महानगरपालिका निकालानंतर मुंबईवर असलेलं ठाकरे कुटुंबियांचं वर्चस्व नष्ट झालं आहे. आता मुंबईवर भाजपचा झेंडा फडकला आहे… महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्र लढली आणि मोठा वियज प्राप्त केला. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेचे विजयी उमेदवार

शिवसेनेने (यूबीटी) 65 जागा जिंकल्या, मनसेने 6 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने (शरद पवार) 1 जागा जिंकली, काँग्रेसने 24 जागा जिंकल्या आणि एआयएमआयएमने 8 जागा जिंकल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 3 जागा, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले