AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपऱ्या लोकांचा वरवंटा आमच्यावर फिरवणार आहात का? मी काय करणार होतो, बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं…

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत असतांना सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तपण्याची शक्यता आहे.

उपऱ्या लोकांचा वरवंटा आमच्यावर फिरवणार आहात का? मी काय करणार होतो, बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: May 04, 2023 | 2:49 PM
Share

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पावर बाबत गंभीर आरोप केला आहे. कुठल्याही दबावाखाली तो निर्णय घेतला नव्हता असे स्पष्टीकरण दिले आहे. रत्नागिरी येथील बारसू येथे माती परीक्षण सुरू असतांना लोकांच्या डोक्याला बंदूक लावून परवानगी घेतली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तिथे जावून शेतकऱ्यांना भेटणार असल्याचे स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. त्यामध्ये कोणाची हिंमत बघायला जात नाहीये असाही टोला उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले मी बारसू येथे जात असलो तरी मी काही कोणाची हिम्मत बघायला जात नाहीये, मी लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना भेटायला जात आहे. मी मुख्यमंत्री असतांना तेव्हा केंद्रातून सांगण्यात आलं होतं की हा प्रकल्प चांगला आहे. मात्र, दबावाखाली याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही असेही ठाकरे म्हणाले.

रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण मान्य नाही, चांगले प्रकल्प गुजरातकडे गेले. प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर सादरीकरण करा, लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेताय, कोणाच्या बाजू घेऊन घेताय. त्या जमिनी उपऱ्यांनी विकत घेतल्या आहेत असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मी माझ्या लोकांना भेटायला जातोय. मला अडवण्यापेक्षा लोकांना उत्तरं द्या. मी पत्र लिहलं कारण खर सांगतो मला खोटं बोलता येत नाही प्रकल्प येत असेल तर ठीक आहे. पण लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे असं म्हणणं होत, भूमिपुत्र आहेत त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये अनेकांनी आंदोलन करत माती परीक्षण सर्वेला विरोध करण्यासाठी आंदोलन देखील केले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल मांडलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.

बारसू येथे प्रकल्प करत असतांना मी असतो तर शेतकऱ्यांना सादरीकरण दाखवले असते. त्यात त्यांना सादरीकरण पटले असते तरच प्रकल्प केला असता. एकतर अडचण दूर नाहीतर प्रकल्प दूर असं केलं असतं. असेही उद्धव ठाकरे यांनी सांगत बारसू येथील शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दौरा नेमका कसा होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड