AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray : शाळेभोवतीचा 500 मीटरचा परिसर सुरक्षित करणार, धोक्याला आदित्य ठाकरेंचा “स्पीडब्रेकर”

शाळेभोवती स्पिडब्रेकर्स (Speed breaker) आवश्यक असल्याचे मत मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सोबतच, विद्यार्थ्यांचे दंत आरोग्य, मधुमेह आणि मानसिक आरोग्यावरही काम होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

Aditya Thackeray : शाळेभोवतीचा 500 मीटरचा परिसर सुरक्षित करणार, धोक्याला आदित्य ठाकरेंचा स्पीडब्रेकर
शाळेभोवतीचा 500 मीटरचा परिसर सुरक्षित करणार-आदित्य ठाकरे
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 3:38 PM
Share

मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजच्याप्रमाणे आजही राजकीय मुद्द्यांना बगल देत काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अनेकदा लहान मुलांची रस्ता ओलांडताना अडचण होते. त्यातून अनेकदा अपघातही झाले आहेत. मात्र आता शाळेभोवतीचा (School) 500 मीटरचा परिसर विद्यार्थ्यांकरता सुरक्षित होणार असल्याची माहिती दिली आहे. शाळेभोवतीचा रस्ता वाहतूकीच्या दृष्टीनं सुरक्षित करण्याचा प्लॅन शासनाकडून आखण्यात आला आहे. त्यासाठी शाळेभोवती स्पिडब्रेकर्स (Speed breaker) आवश्यक असल्याचे मत मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सोबतच, विद्यार्थ्यांचे दंत आरोग्य, मधुमेह आणि मानसिक आरोग्यावरही काम होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांभोवतीच्या धोक्याला स्पीडब्रेकर लागण्यास सहाजिकच मदत होणार आहे. येत्या काही दिवसात या नव्या प्लॅनची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे.

इतिसात काय घडलं यावर आपण का भांडतोय?

तसेच आदित्य ठाकरे यांना राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी त्यावर भाष्य करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या घडीला आम्ही सगळे राजकीय पक्ष इतिहासात काय घडलं? 20, 25 वर्षांपूर्वी काय झालं यावर भांडतोय. सगळी मिडीया स्पेस आम्हीच व्यापून टाकलीय. भविष्यात काय करायचंय यावर बोलतच नाहीये, अशी खंतही आदित्या ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांची सभा विराट होणार

आदित्य ठाकरे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाबाबत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत भाष्य केले आहे. शिवसेनेला इतरांसारखी गर्दी दाखवण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. तर मुख्यमंत्र्यांची सभा विराटच होईल. महाराष्ट्रात महानिकास आघाडीनं कोरोना काळात जे काम केलंय ते सर्वाना माहितीय.

निवडणुकीसाठी केव्हाही तयार

एकनाथ शिंदे यांच्यानंतर पुन्हा आदित्य ठाकरेंनी राजकीय मुद्दे टेकओव्हर करत आपण निवडणुकीसाठी कधीही तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच आज सुरक्षित शाळांबाबत आम्ही नवे उपक्रम हातात घेतोय. महाराष्ट्र कोरोना काळात इतर राज्याच्याही संपर्कात होता. कोरोनाकाळात शिवसेनेने चांगले काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात केव्हाही निवडणुका झाल्या तरी आम्ही तयार आहोत अशी प्रतिक्रिया यावर त्यांनी दिली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसात अनेक घमासान राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यात मनसेने पुन्हा शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा उचलत आव्हान दिलं आहे. त्यामुळे सहाजिकच आगामी निवडणुका या चुरशीच्या होणार आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.