AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविकांत तुपकरांना राज्य सरकारनं दिला शब्द, केंद्राची मदत मिळवून देणार…

रविकांत तुपकर यांच्या या मागणी बरोबरच सोयाबीन आणि कापसाच्या विषयावर केंद्र सरकारमधील मंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रविकांत तुपकरांना राज्य सरकारनं दिला शब्द, केंद्राची मदत मिळवून देणार...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 24, 2022 | 4:32 PM
Share

मुंबईः शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तो पर्यंत मागे हटणार नाही, आणि काहीही झालं तरी जलसमाधी आंदोलन करणारच असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिले होते. त्यानंतर आज त्यांच्यासह कार्यकर्ते मुंबईत धडकल्यानंतर मुख्यंत्री आणि अधिकाऱ्यांनी भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यावर त्यांनी सांगितले की, यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनचा भाव साडेआठ हजार रुपये खाजगी मार्केटमध्ये असणे गरजेच आहे.

आणि कापसाचा भाव साडेबारा हजार रुपये असावा हे करण्यासाठी काय करायचं तर पंधरा लाख मेट्रीक टन सोयापेंडची मागणीही त्यांनी यावेळी केली. तर तेलावरच्या आयात कर 30 लावण्याचीही मागण त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर सोयाबीनवरचा जीएसटी रद्द करावा आणि सोयाबीनला वायदे बाजारामध्ये घेण्याची मागणी त्यांनी केली. या सर्व विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच चर्चा झाल्या्चेही त्यांनी सांगितले.

रविकांत तुपकर यांनी केलेल्या या सगळ्या मागण्या या केंद्र सरकारशी संबंधित होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्य सरकारचे शिष्ट मंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि वाणिज्य मंत्र्यांना भेटणार असल्याचे अश्वासनह त्यांनी यावेळी दिले.

रविकांत तुपकर यांच्या या मागणी बरोबरच सोयाबीन आणि कापसाच्या विषयावर केंद्र सरकारमधील मंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर नुकसान भरपाईचे जे निकष लावण्यात आले होते, ते बदलण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे नुकसान भरपाई वाढवून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतीला जो त्रास होतो आहे. त्यामुळे शेतींना कंपाऊंड करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीवर सरकारने तात्काळ बैठक घेऊन त्यावर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचा शब्दही सरकारकडून देण्यात आला आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ