AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात, ही दुटप्पी भूमिका; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसींचे घटक आहेत. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ओबीसींना आरक्षण द्यावं.

फडणवीस आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात, ही दुटप्पी भूमिका; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र
अमोल मिटकरी राज ठाकरे यांच्यावर टीकाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 4:09 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी भाजपवर (bjp)  जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे ओबीसींचे घटक आहेत. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ओबीसींना आरक्षण द्यावं. एकीकडे फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका, अशी घणाघाती टीका अमोल मिटकरी यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणावरून राजकारण करायचा हा देवेंद्र फडणवीस यांचा सुप्त अजेंडा आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला कालपासून कामकाज हाणून पाडायचं होतं. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. काही काम नसल्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.

आमदार अमोल मिटकरी यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेतलं. नितीन गडकरी यांनी दाऊदची तुलना स्वामी विवेकानंदांशी केली होती. ती चालते. पण नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध नसताना गोंधळ घातला जातोय, अशी टीका मिटकरी यांनी केली. भाजपने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. त्यावर नरहरी झिरवळ यांनी सही केली. त्यामुळे आता सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाही. नरहरी झिरवळ हे अत्यंत साधे आहेत. त्यांच्या साधेपणाचा फायदा या कलम कसायांनी घेतला. कलम दिली आणि चुकीने ते झालं, माझ्या हातीही कलम दिली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपने दलाल सोडले

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करता येणार नसल्याचा अहवाल आला आहे. त्याबाबत विचारले असता, भाजपने एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही दलाल सोडले आहेत. त्यांनीच हे सगळं पसरवलंय, असा दावा त्यांनी केला.

राज्यपालांना जाब विचारला जाईल

सोलापूरात जाऊ नये अशी विनंती राज्यपालांना सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केली होती. पण विंचवाच्या बिऱ्हाडात हात घालण्याची राज्यपालांना सवय आहे. ते सोलापुरात आले. त्यामुळे शिवप्रेमींनी राडा केला. राज्यपालांना प्रत्येक ठिकाणी जाब विचारला जाईल, सोलापूरसह अख्खा महाराष्ट्र पेटेल, असा इशाराच त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानमधील मशीदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांवर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई नको, हायकोर्टाकडून फोन टॅपिंग प्रकरणी दिलासा

Maharashtra News Live Update : राज्यपालांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोहोचलं

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...