AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीसांनी सांगितलं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं कारण

या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता अभियानासाठी आल्याचा आनंद आहे.

अमृता फडणवीसांनी सांगितलं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं कारण
अमृता फडणवीसांकडून मुंबईत स्वच्छता मोहीम Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 26, 2022 | 6:15 PM
Share

Tv9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः अमृता फडणवीस सहभागी झाल्यात. मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाते. या मोहिमेत अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी हाती ब्रश घेऊन पुतळ्यावरून फिरविला. पुतळ्यावर बसलेली धूळ दूर केली. बाजूनं पाणी सोडण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम (Swachhta Mission) राबविण्यात आली. यापूर्वीच्या स्वच्छता मोहिमेतही अमृता फडणवीस या स्वच्छता मोहिमेत पाहायला मिळाल्या होत्या.

स्वच्छतेत लक्ष्मीचा वास

अमृता फडणवीस म्हणाल्या, नवरात्रीचा पर्व असून स्वच्छतेला महत्व दिलं जातं. या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता अभियानासाठी आल्याचा आनंद आहे. आपल्या घराप्रमाणेच आजूबाजूच्या परिसरात ही स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवं.

स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा, सरस्वतीचा निवास आहे. एक विनंती करते सर्वांना महाराष्ट्राला स्वच्छ राज्य आणि मुंबईला सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळायला हवं. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

सुरक्षित माता अभियानावर अमृता फडणवीस म्हणाल्या, प्रत्येक घरातील माता सुरक्षित आणि शिक्षित असायला पाहिजे. प्रत्येक मातेची प्रकृती चांगली व सुदृढ असायला हवी.

गरबा परवानगीबाबत

गरबा परवानगीबाबत अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, बारा वाजेपर्यंत परवानगी दिली तर मला स्वतःला आवडेल. मी स्वतः दांडिया खेळायला जाते. पण सरकारने कायदा व सुव्यवस्था पाहून निर्णय घ्यावा.

या स्वच्छता मोहिमेची पोस्टही अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्वीटक अकाउंटला पोस्ट केली होती. स्वच्छतेच्या त्या खऱ्या ब्राँड अम्बॅसिडर ठरल्या.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.