AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’

Andheri Subway Waterlogging | यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये 'नो एन्ट्री'
अंधेरी सबवे
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 2:36 PM
Share

मुंबई: शहरातील सखल भागांपैकी एक असलेल्या अंधेरी सब वे मध्ये पावसाळ्यात (Rain) पाणी साचत असल्यामुळे वाहतूक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून तब्बल महिनाभर अंधेरी सब वे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. (Waterlogging at Andheri Subway in Mumbai)

त्यामुळे 21 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमधून प्रवास करता येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत हा मार्ग बंद राहील. मुंबईत जरासा जास्त पाऊस पडला की अंधेरी सब वेमध्ये लगेच पाणी साठते. अशावेळी रात्री पाऊस सुरु असल्यास साचलेल्या पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी महिनाभर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबाग परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत रडार बसवणार

हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील. तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...