AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’

Andheri Subway Waterlogging | यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये 'नो एन्ट्री'
अंधेरी सबवे
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 2:36 PM
Share

मुंबई: शहरातील सखल भागांपैकी एक असलेल्या अंधेरी सब वे मध्ये पावसाळ्यात (Rain) पाणी साचत असल्यामुळे वाहतूक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून तब्बल महिनाभर अंधेरी सब वे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. (Waterlogging at Andheri Subway in Mumbai)

त्यामुळे 21 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमधून प्रवास करता येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत हा मार्ग बंद राहील. मुंबईत जरासा जास्त पाऊस पडला की अंधेरी सब वेमध्ये लगेच पाणी साठते. अशावेळी रात्री पाऊस सुरु असल्यास साचलेल्या पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी महिनाभर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबाग परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत रडार बसवणार

हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील. तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.