AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’

Andheri Subway Waterlogging | यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये 'नो एन्ट्री'
अंधेरी सबवे
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 21, 2021 | 2:36 PM
Share

मुंबई: शहरातील सखल भागांपैकी एक असलेल्या अंधेरी सब वे मध्ये पावसाळ्यात (Rain) पाणी साचत असल्यामुळे वाहतूक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून तब्बल महिनाभर अंधेरी सब वे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. (Waterlogging at Andheri Subway in Mumbai)

त्यामुळे 21 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमधून प्रवास करता येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत हा मार्ग बंद राहील. मुंबईत जरासा जास्त पाऊस पडला की अंधेरी सब वेमध्ये लगेच पाणी साठते. अशावेळी रात्री पाऊस सुरु असल्यास साचलेल्या पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी महिनाभर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबाग परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत रडार बसवणार

हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील. तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....