AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Gote : पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये कोण उधळतंय? अनिल गोटेंचा सवाल; फडणवीसांवर टीका करत म्हणाले, कारस्थानी

राज्याच्या अनेक भागांत पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. खत उपलब्ध नाही. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दुसरीकडे अशाप्रकारची पैशांची उधळपट्टी होत आहे. हा पैसा नेमका कुठून आला, याचा तर हिशोब लावायचा आहे, असे अनिल गोटे म्हणाले.

Anil Gote : पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये कोण उधळतंय? अनिल गोटेंचा सवाल; फडणवीसांवर टीका करत म्हणाले, कारस्थानी
अनिल गोटेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 29, 2022 | 6:09 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. या आमदारांचा गुवाहाटीतील खर्च कोण करत आहे, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. या विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना पत्र लिहिले आहे. स्वत: त्यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार देऊन आलेलो आहे. त्याची एक प्रत माझ्याकडे आहे. राज्यपाल यांच्यासह सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, अॅन्टी करप्शन या संस्थांकडेही तक्रार केल्याचे अनिल गोटे (Anil Gote) यांनी सांगितले आहे. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा घणाघात गोटे यांनी बंडखोरांवर केला आहे. एखाद्याकडे दहा-पाच लाख सापडले की त्याच्यावर कारवाई होते. मात्र यांच्यावर काहीच होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘एक खाणारे जाऊन दुसरे येणार’

हे सरकार गेले आणि ते सरकार आले तर सर्वसामान्य नागरिकांवर काहीही फरक पडणार नाही. उलट एक खाणारे जाऊन दुसरे खाणारे आले, एवढाच काय तो फरक असेल, असे ते म्हणाले. या माणसांवर एवढा खर्च कसा? सहा फ्लाइट. दोन माणसांसाठी विशेष विमान. हा सर्व खर्च करत आहे कोण, असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत कपटी, लबाड आणि कारस्थानी आहेत. त्यांचेच हे कारस्थान आहे. हा लोकशाहीचा खेळ देशाला घातक आहे.

‘खुलेआम नंगानाच सुरू’

राज्याच्या अनेक भागांत पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. खत उपलब्ध नाही. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दुसरीकडे अशाप्रकारची पैशांची उधळपट्टी होत आहे. हा पैसा नेमका कुठून आला, याचा तर हिशोब लावायचा आहे, असे अनिल गोटे म्हणाले. महाराष्ट्रात जो काही राजकीय तमाशा सुरू आहे, खुलेआम नंगानाच सुरू आहे. त्याला न्यायालयाने रोख, लगाम लावायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यपालांवर कोणतीही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला.

काय म्हणाले अनिल गोटे?

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...