AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर पक्ष न स्थापन करता कोणताही उद्योगपती पंतप्रधान होईल; उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. शिवसेनेचं नेमकं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. लोकांच्या मनात संभ्रम आहे. कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावर स्थापन होतो.

तर पक्ष न स्थापन करता कोणताही उद्योगपती पंतप्रधान होईल; उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 08, 2023 | 2:07 PM
Share

मुंबई: निवडणूक आयोगात शिवसेनेवरील सुनावणी पार पडली आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचे? यावर निवडणूक आयोग कधीही निकाल देण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कुणाकडे किती आमदार आणि खासदार आहेत यावर पक्षाचा निकाल देऊ नये. तर पक्षाची घटना आणि जनमानसातील पक्षाचं स्थान यावर पक्ष कुणाचा याचा निर्णय द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. शिवसेनेचं नेमकं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. लोकांच्या मनात संभ्रम आहे. कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावर स्थापन होतो.

त्याच हेतूने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. पक्ष केवळ लोकप्रतिनिधीवर अवलंबून असेल तर कोणताही उद्योगपती आमदार आणि खासदार फोडून पंतप्रधान होऊ शकतो. मग अशा गोष्टीला काही अर्थ उरणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमदार, खासदार म्हणजे पक्ष नाही

निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजे पक्ष असं ठरवलं तर ते हस्यास्पद ठरेल. तसंच करायचं असेल तर मग निवडणूक आयोगाने इतका वेळ थांबण्याची गरज नाही. उद्या कोणी पैसेवाला किंवा उद्योगपती उठेल आणि निवडणूक न लढवता, पक्ष न स्थापन करता खासदार विकत घेईल आणि पंतप्रधान होईल. असं करणं म्हणजे लोकशाही नाही.

म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही सदृढ करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. आम्ही कागदपत्रे दिल्यानंतर शिंदे गटाच्या तोंडचं पाणी पळालं असेल, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यनेतापद घटनाबाह्य

आमच्या घटनेते मुख्यनेता असं पदच नाही. शिवसेनाप्रमुख या पदानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद आम्ही निर्माण केलं आहे. मुख्यनेता हे पद घटनाबाह्य आहे. ते पद विचारात घेतलं जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

शिवसेनेला घटना आहे. नेता आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात. यावेळची निवडणूक 23 जानेवारी रोजी होणं अपेक्षित होतं. निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. अध्यक्ष निवडण्याची परवानगी द्या किंवा आहे तसं चालू ठेवा अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर अजून उत्तर आलं नाही. आयोग परवानगी देईल तेव्हा निवडणूक होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विभागप्रमुखपद घटनाबाह्य

घटना आणि घटनेनुसार शिवसेनेची पदं निर्माण केली आहेत. शिवसेना प्रमुख हे पद होतं. ते बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतं. म्हणून ते पद आम्ही गोठवलं किंवा आहे तसंच ठेवलं म्हणा. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार केलं. गेले काही वर्ष पक्षप्रमुख म्हणून मी शिवसेनेचं काम पाहत आहे.

शिवसेना मुख्यनेता हे पद घटनाबाह्य आहे. विभागप्रमुख हे पद केवळ मुंबईतच आहे. मुंबईबाहेर इतर जिल्ह्यात विभागप्रमुखपद नाही, असं सांगतानाच शिवसेनेवरील गद्दारांचा दावा खोटा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....