AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Alert 2026: चुकीची माहिती देऊन काढला PF चा पैसा? EPFO वसूल करणार रक्कम? दंडासह मोठी कारवाई?

EPFO Alert 2026: चुकीची माहिती अथवा खोटे कारण देऊन जर तुम्ही पीएफ रक्कम काढली तरी कुणालाच कळणार नाही असं होत नाही. खोटे कारण समोर आल्यास तुमच्यावर दंडाची नाही तर ही मोठी कारवाई होऊ शकते. काय आहे मोठी अपडेट?

EPFO Alert 2026: चुकीची माहिती देऊन काढला PF चा पैसा? EPFO वसूल करणार रक्कम? दंडासह मोठी कारवाई?
ईपीएफओ अलर्टImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 08, 2026 | 9:25 AM
Share

EPFO Alert 2026: जर तुम्ही चुकीची आणि खोटी माहिती देऊन पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर सावध व्हा, कारण असे प्रकार केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खपवून घेत नाही. जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि त्यासाठी योग्य कारण तुमच्याकडे असेल तर चिंता नाही. पण तुम्ही जर चुकीची आणि खोटी माहिती देऊन पीएफ रक्कम काढली तर त्याचा फटका बसू शकतो. संघटनेने EPF सदस्यांना याविषयीचा इशारा दिला आहे. EPFO ने समाज माध्यमावर याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, ईपीएफचा पैसा काढण्यासाठी चुकीची माहिती दिली तर त्याचा फटका बसू शकतो. अशा प्रकरणात दंडासह मोठी कारवाई होते.

ईपीएफओने काय दिला इशारा?

ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, चुकीच्या कारणं देऊन PF चा पैसा काढला तर EPF योजना 1952 अंतर्गत ही रक्कम वसूल करण्यात येते. इतकेच नाही तर पुढे काही वर्षे रक्कम काढण्यावरही प्रतिबंध येतो. तसेच पीएफ सदस्याला दंडाची रक्कमही भरावी लागते. भविष्याच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक परिस्थितीच योग्य कारण देऊन पीएफ पैसा काढा असे आवाहन ईपीएफओने केले आहे. पीएफ हे भविष्याचे सुरक्षा कवच असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

जाणून घ्या केव्हा काढता येतो पैसा

ईपीएफ योजना 1952 मध्ये याविषयीचे नियम स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ठराविक कारणासाठी तुम्ही पीएफ रक्कम काढू शकता.

लग्न (स्वत:च, मुलाचं, भाऊ आणि बहीण)

मुलांच्या शिक्षणासाठी

गंभीर आजार असल्यास

घर खरेदी अथवा घर दुरुस्ती, घराचं बांधकाम

या कारणासाठी तुम्हाला पीएफची रक्कम काढता येते. जर तुम्ही ही रक्कम इतर कारणासाठी खर्च केली तर ईपीएफओ तुमच्याकडून ही रक्कम पूर्णपणे वसूल करू शकते. तर तुम्ही जितकी रक्कम काढली. त्यावर व्याज सुद्धा आकारले जाते. तर याप्रकरणी दंडही वसूल केली जाते.

नियम 68B(11)काय सांगतो?

ईपीएफ नियम 68B(11) अंतर्गत जर रक्कमेचा चुकीचा वापर झाल्यास आणि तसे आढळून आल्यास म्हणजे पीएफ रक्कम काढण्यासाठी जे कारण दिले त्यासाठीच ती रक्कम खर्च न झाल्यास पीएफ सदस्याला दंड आकारण्यात येणार आहे. तर असे सदस्य पुढे तीन वर्षांपर्यंत पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाहीत. तर जी रक्कम काढली, तिच्यावर व्याजाची रक्कमही जमा करावी लागेल. पीएफ खाते हे कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आहे हे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला