AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांचा उपचार

कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांनी उपचार केला जाणार आहे (Ayush task force).

सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांचा उपचार
| Updated on: Jun 22, 2020 | 10:42 PM
Share

मुंबई :  मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांनी उपचार केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या आयुष टास्क फोर्सच्या टीमने (Ayush task force) आज (22 जून) बीकेसी येथील कोव्हिड सेंटरला प्रथमच भेट दिली. यावेळी टीमने आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या नियमावलीनुसार औषधांचे वाटप केले (Ayush task force).

बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयात 500 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 200 रुग्णांना कोरोनाचे सौम्य लक्षणं आहेत. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना उद्यापासून आयुष मंत्रालयाने सूचवलेले औषधं देण्यात येणार आहेत. या औषधांमध्ये संशमनी वटी, आयुष क्वाथ डिस्पर्सिबल टॅब्लेटस, आयुष काढा यांचा समावेश आहे.

“आयुष मंत्रालयाने सूचवलेल्या या औषधांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणे कमी होण्यास मदत होणार आहे. तीनही औषधं एकत्रितपणे काम करणार आहेत. ही औषधं रुग्णांना पूर्णपणे बरं होण्यास मदत करतील”, असा विश्वास ‘आयुष टास्क फोर्स’च्या सदस्या डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध

मुंबईत 67 हजार 586 कोरोना रुग्ण

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे 1 हजार 98 रुग्ण आढळले आहेत. मुंबई आतापर्यंत 67 हजार 586 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, यापैकी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 34 हजार 121 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या मुंबईत 29 हजार 720 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसभरात 1,962 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज (22 जून) दिवसभरात 1 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात 3 हजार 721 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.