AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. (bhai jagtap taunt bjp over modi government's 7th anniversary)

आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले
bhai jagtap
| Updated on: May 30, 2021 | 12:41 PM
Share

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. मुंबईतही मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने कार्यक्रम घेतला. यावेळी कार्यक्रमस्थळी पोलीस आल्याने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप पोलिसांवर भडकले. त्यामुळे कार्यक्रमात काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. (bhai jagtap taunt bjp over modi government’s 7th anniversary)

मुंबईत काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी कार्यक्रमात पोलीस आल्याने भाई जगताप पोलिसांवर भडकले. आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करता? तुमचं काय काम? असा सवाल भाई जगताप यांनी पोलिसांना केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर चक्क या कार्यक्रमातून पोलिसांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

70 वर्षात कमावलं, 7 वर्षात गमावलं

यावेळी भाई जगताप यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या 70 वर्षात देशानं जे कमावलं ते अवघ्या सात वर्षात कमावलं आहे. मोदी हे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. केनिया सारखा देश आपल्याला मदतीसाठी विचारतो आणि केंद्र सरकार त्यांच्यापुढे कटोरा घेऊन उभे राहते ही लाजिरवाणीबाब आहे, अशी टीका जगताप यांनी केली.

तर पहिली अटक मला करा

गेल्या सात वर्षात भाजपने देशात काहीच विकास केला नाही. उलट देश भकास केला. गेल्या सात वर्षात काय केलं? काय प्रगती केली?, असा सवाल त्यांनी केला. आम्ही कायदा पाळून आंदोलन करत आहोत. जर आम्ही कायदा मोडून आंदोलन करत आहोत असं वाटत असेल तर पहिली मला अटक करा, असं ते म्हणाले. यावेळी आमच्या लहान मुलांच्या लस विदेशात का पाठवल्या?, अशा घोषणाही देण्यात आल्या.

आम्ही लोकांना रस्त्यावर येऊ दिलं नाही

लसीकरण केंद्र आहेत. मात्र लसीकरण केंद्रात अवघ्या 100 लस आहेत. लसीचा पुरवठा होत नाही. देशाला लस मिळत नाही. काँग्रेसने 70 वर्षात काय केलं हे कोणत्या तोंडाने विचारता? असा सवालही त्यांनी केला. आम्ही 70 वर्षात 13 लसींची निर्मिती केली. पण लोकांना रस्त्यावर येऊ दिलं नाही. आम्ही आतापर्यंत रुग्णांना विविध आजारांच्या लसी मोफत दिल्या आहेत. केंद्राने लसीकरण केलं म्हणजे उपकार केले नाहीत, असंही ते म्हणाले.  70 वर्षात गंगेत मृतदेह वाहून जाण्याचं चित्रं कधी पाहिलं नाही. देशात असं कधी घडलं नाही. तुम्ही सरकार म्हणून नागरिकांचं संरक्षण कसं करणार आहात? , असा सवालही त्यांनी केला. (bhai jagtap taunt bjp over modi government’s 7th anniversary)

संबंधित बातम्या:

अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला

Maharashtra Coronavirus LIVE Update : केंद्राने लसीकरण पुरवठा केला म्हणजे उपकार केले नाहीत : भाई जगताप

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल; विजय वडेट्टीवारांनी केल्या ‘या’ तीन मागण्या

(bhai jagtap taunt bjp over modi government’s 7th anniversary)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.